Transportaion Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! एसटीनंतर आता रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार

मुंबई : सर्वसामान्य गावचा किंवा इतर प्रवास करण्यासाठी पहिली पसंती लालपरी म्हणजे एसटी बसला देतात. मात्र काही दिवसांपूर्वी वाढत्या महागाईमुळे एसटी बस कर्मचाऱ्यांनी बसचे भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसटीच्या प्रवास दरात १४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर आता एसटीमागोमाग रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महाग (Transportaion Price Hike) होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे ऐन महागाईत सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे.



राज्यभरात सातत्याने वाढत चाललेली महागाई पाहता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल डिजेलचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाच्या दरात २ रुपये आणि टॅक्सीच्या दरात ४ रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तसेच शहरी बससेवेचे तिकीटसुद्धा १ ते ५ रुपयांनी महागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Transportaion Price Hike)

Comments
Add Comment

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.