Khopoli Accident : पाली-खोपोली मार्गावर अज्ञात वाहनाने रिक्षाला उडवले, दोन जण जागीच ठार तर एक गंभीर

खोपोली : पाली-खोपोली मार्गावर आज पहाटे अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात (Khopoli Accident) झाला. यात रिक्षामधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.


पाली-खोपोली मार्गावरून कंपनीतून रात्रपाळी करून कामावरून घरी रिक्षा क्रमांक (MH 14 J 4840) ही चालक महेश खरात (रा. कळंब, ता. सुधागड) हे घेऊन जात असताना ते दुरशेत जवळ आले असता अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील रामदास ज्ञानेश्वर घोगरकर आणि अजित हरिश्चन्द्र वाघमारे (रा, घोडपापड जांभूळपाडा) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षा चालक महेश खरात हा गंभीर जखमी असल्याने त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



याप्रकरणी पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत. अजित वाघमारे यांची दोन लहान मुले आहेत तर रामदास घोगरकर हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी तपासाची मागणी केली आहे.


या मार्गावर विशेष म्हणजे अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने खोपोली वरून अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या १०८ ॲम्बुलन्स मधून जखमी ड्रायव्हरला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे पाठवले गेले.


दुर्दैवाने या मार्गावर अॅम्ब्युलन्स सेवा तत्काळ उपलब्ध होत नसल्याने वेळेत उपचार भेटत नाहीत, ही शोकांतिका आहे.

Comments
Add Comment

ॲमेझॉन इंडिया ने आर्मी विमेन्स वेल्फेयर असोसिएशन बरोबर केला सहकार्य करार

- सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलांमध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदत बंगळुरु : आंतरराष्ट्रीय

मॅरियट बॉनव्हॉय आणि स्विगीची भागीदारी; दैनंदिन जीवनात मिळणार आनंद

स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मिळणार मॅरियट बॉनव्हॉयचे फायदे मुंबई : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून