Amravati News : सावकारगिरी करणाऱ्या अवैध महिलांवर सहकार विभागाची धाड

स्टॅम्प पेपरसह अन्य दस्तऐवज जप्त


अमरावती : अमरावती शहरालगत दोन महिला स्वतंत्ररित्या अवैध सावकारी करत असल्याची तक्रार सहकार विभागाकडे प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे सहकार विभागाच्या दोन पथकांनी एकाचवेळी धाड टाकून या दोन्ही महिलांच्या ताब्यातील स्टॅम्प पेपर व अन्य दस्तावेज जप्त केले. या प्रकरणात सहकार विभागाने चौकशी सुरू केली आहे. अवैध महिला सावकारावर जिल्ह्यात अलीकडे झालेली ही पहिलीच कारवाई आहे.


काही दिवसांपूर्वीच मोर्शी सहायक निबंधक कार्यालयात एका तक्रारदाराने मोर्शीत दोन महिला अवैध सावकारी करत असल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे सहकार विभागले दोन पथके तयार केली. या दोन्ही महिला मोर्शी येथे अप्पर वर्धा विभागाच्या - वापरात नसलेल्या शासकीय वसाहतीतून अवैध सावकारी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने एकाच वेळी दोन्ही महिलांकडे धाड टाकली. त्यावेळी दोन्ही - ठिकाणांहून पथकाला अवैध सावकारी - संबंधित स्टॅम्पपेपर व इतर महत्त्वाचे दस्तावेज मिळून आले. सहकार विभागाच्या पथकाने ते जप्त केले आहेत. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख स्वाती गुडघे, पथक प्रमुख प्रीती धामणे, सुधीर मानकर, प्रदीप देशमुख, अविनाश महल्ले यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.



मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी लेखी व्यवहारापेक्षा तोंडी व्यवहारच अधिक केले आहे. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कारवाईसाठी नेमलेल्या पथक तक्रारदाराने महिला अवैध सावकारी करत असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईसाठी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले. महिला अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन ही कारवाई यशस्वी केली. या वेळी पुरुष अधिकारी, कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी होते मात्र नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनीच केले. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख स्वाती गुडघे, पथक प्रमुख प्रीती धामणे, सुधीर मानकर, प्रदीप देशमुख, अविनाश महल्ले यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर