उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकात भीषण अपघात

बांधकाम सुरू असलेली लिंटल कोसळली; अनेक कामगार अडकले, मदतकार्य सुरू


कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामादरम्यान एक गंभीर दुर्घटना घडली. स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम सुरू असलेला लिंटेल अचानक कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला. अपघाताच्या वेळी २४-२५ कामगार बांधकामात व्यस्त होते. त्यापैकी आतापर्यंत १८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने इतर गाडलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू ठेवले आहे.


घटनास्थळी मदतकार्याला वेग


या दुर्घटनेत अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन, रेल्वे अधिकाऱ्यांसह एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य गतीने सुरू केले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले जात आहे.


?si=AOcIkJ9dfzEu44M1

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत काम


अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कन्नौज स्थानकावर विकासकाम सुरू होते. मात्र, याच कामादरम्यान लिंटेल कोसळल्याने अपघात घडला. घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.


मुख्यमंत्र्यांचे निर्देश


घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना तत्काळ आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.



समाजकल्याण मंत्र्यांची उपस्थिती


समाजकल्याण राज्यमंत्री असीम अरुण हे देखिल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्याचा आढावा घेत आहेत. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली आहे. प्रशासनाने या दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.


स्थानकावर वातावरण तणावपूर्ण


दुर्घटनेमुळे स्थानकावर तणावाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या