Kalyan Sex Racket : कल्याणमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्या व्यवसायातून १३ महिलांची सुटका

कल्याण : कल्याण स्टेशनजवळ होत असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायातून १३ महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या १३ महिलांचीही सुटका केली आहे.तक्रारींच्या आधारे कारवाई करत पोलीस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकाजवळ छापा टाकला. यावेळी, तीन महिलांसह चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं.


पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरातील एसटी बस स्टॉपच्या मागे उघड्यावर बेकायदेशीरपणे हे काम सुरू होतं. या कारवाईत पोलिसांना बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलं आहे.




घटनास्थळावरून १३ महिलांची सुटका करण्यात आली आणि अधिक सुरक्षिततेसाठी त्यांना उल्हासनगर येथील आश्रयगृहात पाठवण्यात आलं. सुटका केलेल्या महिलांची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून, त्यांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलं आहे. या महिलांना समुपदेशन आणि सरकारी योजनांद्वारे मदत दिली जाईल.या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे आणि ते किती काळापासून चालवलं जात होतं याचाही तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट ४ नोव्हेंबरला होणार लाँच

मुंबई : ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही व्हेन्यूचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल ४ नोव्हेंबर रोजी भारतीय

घरूनच भरता येणार शाळेची फी ! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांना पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि पालकांसाठी सोयी

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला

समुद्रकिनारी रोमान्स : हार्दिक आणि माहिकाची प्रेमकहाणी उलगडली!

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

मुंबई : ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुकामेवा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये खजूर हे एक

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी