India Cricket Team Leader : रोहित शर्मा नंतर 'हा' खेळाडू होणार भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार

मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मॅच दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे रोहितला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थित जसप्रीत बुमराहने टीमच्या नेतृत्वाची कामगिरी हाती घेतलीय. अशातच आता रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना सुनील गावसकर यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.


गावसकरांच्या मते रोहित शर्मा नंतर भारतीय कसोटी संघाचा उत्तम कर्णधार जसप्रीत बुमराह होऊ शकतो. नुकताच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान बुमराह चमकला होता. त्याने त्याच्या गोलंदाजीने ३२ गडी बाद केले होते.



सुनील गावसकर यांनी माध्यमांशी चर्चा करताना म्हटले की, ' जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होऊ शकतो. तो संघाची जबाबदारी घेऊन नेतृत्व करतो. त्याच्यात नेतृत्वाचे गुण आहेत. तो असा खेळाडू आहे, जो गरज नसताना तुमच्यावर दबाव टाकणार नाही. कधी कधी असे कर्णधार असतात, जे गरज नसताना खूप दबाव टाकतात. ज्याला जे काम दिलं गेलय त्याने तेच करावं, इतकीच अपेक्षा बुमराहला असते. प्रत्येक खेळाडूला आपला रोल माहीत असतो, त्याने तेच काम करावं. त्यासाठी बुमराह कुठलाही दबाव टाकत नाही.'


जसप्रीत बुमराह भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज आहे. त्याने शानदार गोलंदाजी करून भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. गावसकर म्हणाले, ' जसप्रीत बुमराह मिड ऑफ किंवा मिड ऑनला उभा राहतो. तो तिथे असणं हे गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे. असे असले तरी क्रिकेट चाहत्यांचे कसोटी क्रिकेट दरम्यान भारताचा कर्णधार कोण असेल याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

India's First 'All-Weather Subway : भिवंडीत साकारतोय देशातील पहिला 'ऑल वेदर सबवे': रेल्वे रुळ ओलांडण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा!

मुंबई : वेळ वाचवण्याच्या नादात रेल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक

Mayor Ritu Tawade : "मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त"

महापौर रितू तावडे उभ्या राहिल्या कोळी भगिनींच्या पाठीशी मुंबई : वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर

Sunita Ahuja : सुनीता आहुजाची आता ‘लॉकअप २’ मध्ये दमदार एन्ट्री; एकता कपूरच्या शोमध्ये रंगणार नवा ड्रामा

मुंबई : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आता थेट जेलमध्ये जाणार? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. पण हे

liquor VAT : मद्यावरील 'व्हॅट' कमी होणार?

मंत्रालयात हालचाली सुरू; अवैध मद्यपानावर आळा घालण्यासाठी विशेष नियोजन मद्य उत्पन्नात तब्बल १८ टक्क्यांची

Operation Sindoor : आम्ही दहशतवादाच्या संपूर्ण यंत्रणेचा नायनाट करण्याच्या निर्धारावर कायम ठाम - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला आज एक वर्ष

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदल कायम; गुरुवारी 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात होणारे हवामान बदल दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. कुठे पाऊस पडतोय तर कुठे उष्णेतेचा कहर माजला