India Cricket Team Leader : रोहित शर्मा नंतर 'हा' खेळाडू होणार भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार

मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मॅच दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे रोहितला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थित जसप्रीत बुमराहने टीमच्या नेतृत्वाची कामगिरी हाती घेतलीय. अशातच आता रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना सुनील गावसकर यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.


गावसकरांच्या मते रोहित शर्मा नंतर भारतीय कसोटी संघाचा उत्तम कर्णधार जसप्रीत बुमराह होऊ शकतो. नुकताच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान बुमराह चमकला होता. त्याने त्याच्या गोलंदाजीने ३२ गडी बाद केले होते.



सुनील गावसकर यांनी माध्यमांशी चर्चा करताना म्हटले की, ' जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होऊ शकतो. तो संघाची जबाबदारी घेऊन नेतृत्व करतो. त्याच्यात नेतृत्वाचे गुण आहेत. तो असा खेळाडू आहे, जो गरज नसताना तुमच्यावर दबाव टाकणार नाही. कधी कधी असे कर्णधार असतात, जे गरज नसताना खूप दबाव टाकतात. ज्याला जे काम दिलं गेलय त्याने तेच करावं, इतकीच अपेक्षा बुमराहला असते. प्रत्येक खेळाडूला आपला रोल माहीत असतो, त्याने तेच काम करावं. त्यासाठी बुमराह कुठलाही दबाव टाकत नाही.'


जसप्रीत बुमराह भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज आहे. त्याने शानदार गोलंदाजी करून भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. गावसकर म्हणाले, ' जसप्रीत बुमराह मिड ऑफ किंवा मिड ऑनला उभा राहतो. तो तिथे असणं हे गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे. असे असले तरी क्रिकेट चाहत्यांचे कसोटी क्रिकेट दरम्यान भारताचा कर्णधार कोण असेल याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे