Mumbai Crime : माता की वैरिणी! वायरने गळा आवळून जन्मदात्रीने घेतला पोटच्या मुलाचा जीव

  131

मुंबई : मुंबईतील वांद्रे (Mumbai Crime) भागात नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. स्क्रिझोफेनिया आजाराच्या पीडित महिलेने रागाच्या भरात पोटच्या मुलाचा वायरीने गळा आवळून जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी महिला अभिलाषा औटी (३६) हिने तिच्या १० वर्षीय मुलगा सर्वेश याला ठार मारले. आरोपी महिला स्क्रिझोफेनिया आजाराची पीडित असून त्यांची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. काल काही कारणामुळे अभिलाषा यांना राग आला असून रागाच्या भरात त्यांनी सर्वेशला खेचत बेडरुममध्ये नेले. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा बंद करुन वायरने त्याचा गळा आवळला. दरम्यान, या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला.


या प्रकरणी सर्वेशचे वडिलांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अभिलाषा औटी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. (Mumbai Crime)



काय आहे स्क्रिझोफेनिया आजार?


स्क्रिझोफेनिया (Schizophrenia) हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या आजाराच्या रुग्णांना वेगवेगळे भास होणे, बुद्धीभ्रंश आणि मनात विसंगत विचार येणे, असा त्रास जाणवतो. त्यामुळे या व्यक्तींचे वागणे सामान्य नसते.

Comments
Add Comment

राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ

वसई इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! ७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी

पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज

मुंबईतील 'हे' १२ पूल गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धोकादायक! BMC चा निर्वाणीचा इशारा

१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबई

अखेर मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी मिळाली, पण...

आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिली मुंबई: मराठा आरक्षणाच्या

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या

मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील