Mumbai Crime : माता की वैरिणी! वायरने गळा आवळून जन्मदात्रीने घेतला पोटच्या मुलाचा जीव

मुंबई : मुंबईतील वांद्रे (Mumbai Crime) भागात नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. स्क्रिझोफेनिया आजाराच्या पीडित महिलेने रागाच्या भरात पोटच्या मुलाचा वायरीने गळा आवळून जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी महिला अभिलाषा औटी (३६) हिने तिच्या १० वर्षीय मुलगा सर्वेश याला ठार मारले. आरोपी महिला स्क्रिझोफेनिया आजाराची पीडित असून त्यांची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. काल काही कारणामुळे अभिलाषा यांना राग आला असून रागाच्या भरात त्यांनी सर्वेशला खेचत बेडरुममध्ये नेले. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा बंद करुन वायरने त्याचा गळा आवळला. दरम्यान, या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला.


या प्रकरणी सर्वेशचे वडिलांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अभिलाषा औटी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. (Mumbai Crime)



काय आहे स्क्रिझोफेनिया आजार?


स्क्रिझोफेनिया (Schizophrenia) हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या आजाराच्या रुग्णांना वेगवेगळे भास होणे, बुद्धीभ्रंश आणि मनात विसंगत विचार येणे, असा त्रास जाणवतो. त्यामुळे या व्यक्तींचे वागणे सामान्य नसते.

Comments
Add Comment

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या

महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

या पध्दतीत खुल्या गटातील महापौराची शक्यता कमी मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण

श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा

मुंबई पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा

सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात