Health: थंडीत गुळासोबत मिसळून खा ही गोष्ट...नाही होणार सर्दी-खोकला

मुंबई: थंडीच्या दिवसांत आरोग्यकर चांगले राखण्याचे मोठे आव्हान असते. या मोसमात सर्दी-खोकल्याच्या समस्या अधिक सतावता. यामुळे या दिवसांमध्ये खाण्या-पिण्यामध्ये बदल करणे गरजेचे असते. घरातील किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आजारांपासून रोखण्याचे काम करतात. तसेच आरोग्यही चांगले राखते. अशीच एक जबरदस्त गोष्ट आहे लवंग.


याच्या सेवनाने अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. यात थोडेसे गूळ मिसळल्यास याची ताकद अधिक वाढते. आरोग्य तज्ञांच्या मते, लवंग आणि गूळ खाल्ल्याने स्वाद चांगला मिळतो. तसेच आरोग्यही चांगले राहते. हे खाल्ल्याने थंडीच्या दिवसांत होणाऱे आजार दूर होतात.


गुळामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.


यात फायबर आणि मिनरल्स असतात जे पाचनतंत्र मजबूत करण्यास मदत करतात तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतात.


कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोज असल्याने गूळ शरीरासाठी एनर्जी बूस्टर आहे.


गुळामध्ये व्हिटामिन बी आणि मिनरल्स जे आर्यन, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात जे शरीरासाठी गरजेचे असते.


गुळातील अँटीऑक्सिडंट गुण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी चांगले असतात तसेच त्यामुळे केस चमकदारही बनतात.


गुळामध्ये ट्रिप्टोफॅन असते जे मेंटल हेल्थ चांगले राखण्याचे काम राखतात.



लवंग खाण्याचे फायदे


लवंगामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे सर्दी-खोकला दूर करतात.


लवंगामध्ये फायबर आणि मिनरल्स असतात ज्यामुळे पाचनतंत्र मजबूत होण्यास मदत होते.


तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.


थंडीत गूळ आणि लवंग एकत्र मिसळून खाण्याचे फायदे म्हणजे इम्युन सिस्टीम मजबूत होते. तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे