धनंजय मुंडेंनी कोट्यवधींची जमीन २१ लाखांत हडपली, सारंगी महाजनांचा आरोप

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्येचे प्रकरणाला आता इतर विषय जोडले जाण्यास आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या माणसांनी धमकावले आणि गावातली साडेतीन कोटी रुपयांची जमीन अवघ्या २१ लाख रुपयांत खरेदी केली. धमकावून जबरदस्तीने सह्या घेतल्या आणि जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी बदलल्या, असा गंभीर आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. सारंगी महाजन या धनंजय मुंडेंच्या मामी आहेत.



प्रवीण महाजनांच्या निधनाला जवळपास पंधरा वर्षे झाली. आता आमच्या गावातल्या संपत्तीवर यांचा डोळा आहे. धनंजय मुंडेंचे नोकर गोविंद मुंडे यांनी धमकावले. धमकावून जबरदस्तीने सह्या घेतल्या आणि जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी बदलल्या. आता जमीन गोविंद मुंडे, त्यांची सून आणि दशरथ साठे यांच्या नावावर आहे. आधी या विषयाची माहितीच नाही असे दाखवणाऱ्या धनंजय मुंडे यांनी मामी, काळजी करु नकोस. परळीत कोणतीही जमीन विकली गेली तर ती मला कळते असं सांगून धीर दिला होता. पण मी चोराकडेच गेले होते, ते नंतर माझ्या लक्षात आलं, असं सारंगी महाजन म्हणाल्या.



याआधी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा विश्वासू आणि अतिशय जवळच्या माणसांपैकी एक असल्याच्या बातमी वृत्तवाहिन्यांनी दिल्या आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही मागणी जोर धरत असतानाच सारंगी महाजन यांनी जमीन हडपण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांची आणखी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोण आहेत सारंगी महाजन ?

सारंगी महाजन या प्रवीण महाजनांच्या पत्नी आणि भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या वहिनी आहेत.
Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत