Nitin Gadkari : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार केंद्र सरकारकडून 'ही' ट्रीटमेंट’!

परिवहन मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा!


नवी दिल्ली  : केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्रातील महिला, दिव्यांग व्यक्ती, बालकल्याणसह तरुण पिढीसाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. तर आता रस्ते अपघातातील पीडितांसाठीही केंद्र सरकारने नवी योजना जाहीर केली आहे. याद्वारे रस्ते अपघातात (Road Accident) जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत.



केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ (Cashless Treatment Yojana) योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना उपचाराकरिता दीड लाख रुपये दिले जाणार आहेत किंवा जखमींचा सात दिवसांच्या उपचाराचा खर्च आता केंद्र सरकार उचलणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यासंदर्भात माहिती दिली. दिल्लीतील भारत मंडपममध्ये सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली. तसेच या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये सहकार्य वाढवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.


यासंदर्भात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना सुरु केली आहे. त्यानुसार महामार्गावर अपघात झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या प्रवाशांना उपाचारासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे किंवा त्यांच्या सात दिवसांच्या उपचाराचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. मात्र, त्यासाठी २४ तासांच्या आत पोलिसांना अपघाताची माहिती देणे आवश्यक आहे. इतकेच नाही, हिट-अँड-रन प्रकरणांतील मृतांसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.



स्कूल बस चालकांसाठी नवे नियम


शाळा आणि महाविद्यालयासमोर वाहतूक नियोजन नसल्याने दरवर्षी जवळपास १० हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू होते, हेदेखील त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या स्कूल बस चालकांसाठीही आम्ही नवे नियम केले आहेत, एकंदरितच प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Nitin Gadkari)

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या