Investment: SBI 'या' स्कीमने तुम्ही बनू शकता लखपती

मुंबई: देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी एसबीआयने(SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवी स्कीम सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे 'हर घर लखपती'. ही एक रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD स्कीम आहे. याच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला छोटी-छोटी बचत करत मोठा फंड तयार करू शकता. यात वरिष्ठ नागरिकांना अधिक फायदा होणार आहे कारण सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा त्यांना अधिक व्याज मिळणार आहे.



लहान बचत आणि मोठा फंड


ही स्कीन त्या गुंतवणूकदारांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे जे दर महिन्याला एक निश्चित रक्कम या 'हर घर लखपती' योजनेच्या आरडी खात्यात जमा करून मोठा फंड बनवू शकतात. या आरडी योजनेचा मॅच्युरिटी पीरियड ३ ते १० वर्षे आहे. याचा अर्थ एसबीआयच्या या योजनेत गुंतवणूकदार ३ वर्षाच्या कालावधीपासून ते १० वर्षाच्या कालावधीपर्यंत पैसे गुंतवू शकतात. छोटी छोटी बचत केल्यास मॅच्युरिटीवर तुम्हाला मोठी रक्कम मिळवून देऊ शकते.



१० वर्षांच्या मुलांचेही खोलू शकता खाते


'हर घर लखपती' या योजनेत खाते सुरू करण्यासाठीच्या वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास मुलांपासून ते वरिष्ठ नागरिकही यात खाते खोलू शकतात. १० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाची मुलेही यात खाते खोलू शकतात.



७.२५ टक्क्यांपर्यंत व्याज


एसबीआयच्या या स्पेशल आरडी स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणाऱ्या व्याजाबद्दल बोलायचे झाल्यास ते ग्राहक आणि मॅच्युरिटी पीरियडच्या हिशेबाने वेगवेगळे आहे. सामान्य गुंतवणूकदारांना यात ६.७५ टक्के व्याजदर ऑफर केले जात आहे तर वरिष्ठ नागरिकांना 'हर घर लखपती' या योजनेत गुंतवणुकीसाठी ७.२५ टक्के व्याजदर मिळत आहे. एसबीआयचे कर्मचारी यात गुंतवणूक करत असतील तर त्यांना ८ टक्के व्याजदर मिळत आहे.



हफ्ता चुकल्यास किती दंड?


जर दर महिन्याला खात्यात जमा होणारा हफ्ता लेट झाला तर त्यासाठी दंडही आहे. यात १०० रूपयांवर १.५० ते २ रूपयांचा दंड आहे. तर एखाद्या गुंतवणूकदाराने सलग ६ महिने या खात्यात पैसे भरले नाहीत तर त्याचे अकाऊंट बंद करून जमा झालेली रक्कम त्याच्या बचत खात्यावर ट्रान्सफर केली जाईल.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील