Health: रोज सकाळी या पद्धतीने खा पपई, सुधारेल डोळ्यांचे आरोग्य

  81

मुंबई: पपई पोषकतत्वांनी भरपूर असे फळ आहे. पपईचे आरोग्यास अनेक फायदे होतात. तसेच रिकाम्या पोटी पपई खाणेही पाचन, एनर्जी तसेच संपूर्ण आरोग्यासाठी चांगले असते.


पपईमध्ये पपेन नावाचे नॅचरल एन्झाईम असते जे प्रोटीन तोडण्यास आणि त्याचे शोषण करण्यास मदत करते. यात फायबर आणि पाणी बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यास मदत करतात. तसेच पाचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत करतात.


पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते ज्यामुळे इम्युन सिस्टीम मजबूत होते. तसेच दररोज पपई खाल्ल्याने शरीरातील व्हिटामिन सीची कमतरता भरून निघते. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रासही होत नाही.


वजन कमी करण्यासाठी पपई जेवणाच्या २ तास आधी खाल्ला पाहिजे. यावेळेस पचनक्रिया अॅक्टिव्ह असते. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन ए आणि व्हिटामिन ई असते जे फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्यास मदत करतात. तसेच स्किन डॅमेज होण्यापासूनही वाचते. पपई दररोज खाल्ल्याने स्किनला ग्लो येतो तसेच मुरूमांची संख्याही कमी होते. वय वाढण्याची प्रक्रियाही मंदावते.


हृदयाच्या आरोग्यासाठी पपई अतिशय फायदेशीर आहे. यात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यात अँटी इन्फ्लामेंटरी गुणही असतात.


पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतो त्यामुळे हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यातील फायबर ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतात.


पपईमध्ये व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिन असते जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे रात्रीची दृष्टी सुधारण्यातही मदत होते. लिव्हर आणि किडनीसाठीही पपई अतिशय फायदेशीर आहे. यातील फायबर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे