Health: रोज सकाळी या पद्धतीने खा पपई, सुधारेल डोळ्यांचे आरोग्य

मुंबई: पपई पोषकतत्वांनी भरपूर असे फळ आहे. पपईचे आरोग्यास अनेक फायदे होतात. तसेच रिकाम्या पोटी पपई खाणेही पाचन, एनर्जी तसेच संपूर्ण आरोग्यासाठी चांगले असते.


पपईमध्ये पपेन नावाचे नॅचरल एन्झाईम असते जे प्रोटीन तोडण्यास आणि त्याचे शोषण करण्यास मदत करते. यात फायबर आणि पाणी बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यास मदत करतात. तसेच पाचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत करतात.


पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते ज्यामुळे इम्युन सिस्टीम मजबूत होते. तसेच दररोज पपई खाल्ल्याने शरीरातील व्हिटामिन सीची कमतरता भरून निघते. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रासही होत नाही.


वजन कमी करण्यासाठी पपई जेवणाच्या २ तास आधी खाल्ला पाहिजे. यावेळेस पचनक्रिया अॅक्टिव्ह असते. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन ए आणि व्हिटामिन ई असते जे फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्यास मदत करतात. तसेच स्किन डॅमेज होण्यापासूनही वाचते. पपई दररोज खाल्ल्याने स्किनला ग्लो येतो तसेच मुरूमांची संख्याही कमी होते. वय वाढण्याची प्रक्रियाही मंदावते.


हृदयाच्या आरोग्यासाठी पपई अतिशय फायदेशीर आहे. यात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यात अँटी इन्फ्लामेंटरी गुणही असतात.


पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतो त्यामुळे हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यातील फायबर ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतात.


पपईमध्ये व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिन असते जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे रात्रीची दृष्टी सुधारण्यातही मदत होते. लिव्हर आणि किडनीसाठीही पपई अतिशय फायदेशीर आहे. यातील फायबर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण