धक्कादायक! लग्नाच्या २६व्या वाढदिवसाला लग्नातले कपडे घातले, नंतर केली आत्महत्या

  75

नागपूर: नागपूरच्या जरीपटका परिसरातील मार्टिननगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पती-पत्नीने लग्नाच्या २६व्या वाढदिवसालाच आत्महत्या केली. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. पती-पत्नीच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.


मृत दाम्पत्य जेरील डासमोन ऑस्कर मॉनक्रीफ(४८) आणि एनी जेरील मॉनक्रीफ(४५) अनेक वर्षांपासून मूल होत नसल्याने तसेच बेरोजगारीमुळे त्रस्त होते. लग्नाच्या २६ वर्षानंतरही त्यांना मूलबाळ नव्हते.



पती-पत्नीने गळफास लावून घेत केली आत्महत्या


७ जानेवारी २०२५ला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दिवशी त्यांनी आत्महत्येच्या आधी लग्नातील कपडे घातले. त्यानंतर व्हिडिओ बcनवला आणि त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलोड केला. यानंतर त्यांनी घरातील नायलॉनच्या दोरीने फाशी लावून घेत आत्महत्या केली.


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि प्रकरणाचा तपास सुरू केली. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १९४ अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याकडून कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. ही आत्महत्या मूल न होत असल्यामुळे तसेच बेरोजगारीमुळे तणाव वाढल्याने करण्यात आली.


या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यावरून मानसिक आरोग्य तसेच आर्थिक दबाव अशा प्रकारच्या समस्या वाढत असल्याचे चित्र दर्शवते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या