Manmad Accident : मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यु...!

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनमाड येथील चांदवड रोडवर धावत्या ट्रकखाली सापडून दहावीत शिकणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड येथील चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर चांदवड कडुन मनमाड कडे येत असताना रस्त्यात गायी अंगावर आल्याने त्यांना वाचवताना बॅलन्स जाऊन मोटारसायकल पडली व यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने या दोघांनाही चिरडले यात मोटारसायकल वरील आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की या दोन्ही मुलांचा अक्षरशः चुरा झाला यामुळे यांची ओळख पटने देखील शक्य नाही त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.



मोकाट जनावरे आणि रोजची वाहतुक कोंडी मुळे अपघात..!


मनमाड शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे फिरत आहेत याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या मात्र कोणीही याबाबत दखल घेत नाही याशिवाय चांदवड रोड मालेगाव रोड व येवला रोड या महामार्गावर मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असते यामुळे देखील रोज अपघात होत असतात आजही मोकाट जनावरामुळे दोन शाळकरी मुलाचा जीव गेला आहे.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या