Emergency Trailer Launch : 'इमरजन्सी'चा नवा ट्रेलर रिलीज ! हा मराठी अभिनेता करतोय काम

मुंबई : सध्या एकामागोमाग एक जबरदस्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. पुष्पा २ चित्रपट कोट्यवधींची कामाई केली. पुष्पा २ नंतर आलेल्या चित्रपटांनंतरही पुष्पाची क्रेझ कायम आहे. अशातच आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी २५ जून १९७५ मध्ये देशावर लादलेल्या आणिबाणीवर आधारित असलेल्या 'इमरजन्सी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे.

अनेक अडथळ्यांनंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर २०२४ मध्ये स्वातंत्र्य दिनी रिलीज केला होता. यानंतर अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले होते.



चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री कंगना राणौतने केले असून या चित्रपटातील इंदिरा गांधींची भूमिका सुद्धा कंगनाने केली आहे. तर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. रिलीज केलेल्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये अनुपम खेर तुरुंगातून तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहिताना यात दिसतात. या चित्रपटात मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने सुद्धा काम केले आहे.



हा चित्रपट येत्या १७ तारखेला रिलीज होणार असून कंगनाचे इतर चित्रपट ९ वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहे. आता कंगना सोबतच तिच्या चाहत्यांचे सुद्धा १७ तारखेकडे डोळे लागले आहे.
Comments
Add Comment

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबत चुकीची माहिती; महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळासमोर मांडली

शीव उड्डाणपूल येत्या पावसाळ्यात होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व -

तब्बल ४६ वर्षांनंतर भांडुप संकुला २००० दलशक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प येत्या एप्रिल २०२९ पर्यंत होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई :  भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अनधिकृतपणे जाहिरात फलक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारुन

मुंबईकरांसाठी बीडीडी घरांची मोठी सोडत; वरळी आणि नायगाव मध्ये सर्वाधिक घरांचे वितरण

मुंबई : मुंबईकरांसाठी बीडीडीने घरांची सोडत जाहीर केली आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ

गृहविभागाच्या अपर मुख्य सचिव पदी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

मुंबई : राज्याच्या गृहविभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला असून सनदी अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर