Emergency Trailer Launch : 'इमरजन्सी'चा नवा ट्रेलर रिलीज ! हा मराठी अभिनेता करतोय काम

  87

मुंबई : सध्या एकामागोमाग एक जबरदस्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. पुष्पा २ चित्रपट कोट्यवधींची कामाई केली. पुष्पा २ नंतर आलेल्या चित्रपटांनंतरही पुष्पाची क्रेझ कायम आहे. अशातच आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी २५ जून १९७५ मध्ये देशावर लादलेल्या आणिबाणीवर आधारित असलेल्या 'इमरजन्सी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे.

अनेक अडथळ्यांनंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर २०२४ मध्ये स्वातंत्र्य दिनी रिलीज केला होता. यानंतर अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले होते.



चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री कंगना राणौतने केले असून या चित्रपटातील इंदिरा गांधींची भूमिका सुद्धा कंगनाने केली आहे. तर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. रिलीज केलेल्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये अनुपम खेर तुरुंगातून तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहिताना यात दिसतात. या चित्रपटात मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने सुद्धा काम केले आहे.



हा चित्रपट येत्या १७ तारखेला रिलीज होणार असून कंगनाचे इतर चित्रपट ९ वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहे. आता कंगना सोबतच तिच्या चाहत्यांचे सुद्धा १७ तारखेकडे डोळे लागले आहे.
Comments
Add Comment

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.