Emergency Trailer Launch : 'इमरजन्सी'चा नवा ट्रेलर रिलीज ! हा मराठी अभिनेता करतोय काम

मुंबई : सध्या एकामागोमाग एक जबरदस्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. पुष्पा २ चित्रपट कोट्यवधींची कामाई केली. पुष्पा २ नंतर आलेल्या चित्रपटांनंतरही पुष्पाची क्रेझ कायम आहे. अशातच आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी २५ जून १९७५ मध्ये देशावर लादलेल्या आणिबाणीवर आधारित असलेल्या 'इमरजन्सी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे.

अनेक अडथळ्यांनंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर २०२४ मध्ये स्वातंत्र्य दिनी रिलीज केला होता. यानंतर अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले होते.



चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री कंगना राणौतने केले असून या चित्रपटातील इंदिरा गांधींची भूमिका सुद्धा कंगनाने केली आहे. तर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. रिलीज केलेल्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये अनुपम खेर तुरुंगातून तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहिताना यात दिसतात. या चित्रपटात मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने सुद्धा काम केले आहे.



हा चित्रपट येत्या १७ तारखेला रिलीज होणार असून कंगनाचे इतर चित्रपट ९ वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहे. आता कंगना सोबतच तिच्या चाहत्यांचे सुद्धा १७ तारखेकडे डोळे लागले आहे.
Comments
Add Comment

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करणार

आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था

आज मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक नाही

मुंबई : दर मंगळवारी होणारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक २५ नोव्हेंबर रोजी होणार नाही. स्थानिक स्वराज्य

आहे त्याच दरात, लोकलचा प्रवास होणार गारेगार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील युवकांना आश्वासन मुंबई : आम्ही मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित