Thane Malvani Mohtsv : ठाण्यात शुक्रवारपासून मालवणी महोत्सवाची धूम !

  149

ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे १० जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत "मालवणी महोत्सव-२०२५" चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा २६ वे वर्ष असून मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक, डबलबारी, आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.


याशिवाय विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्यस्पर्धा आणि महिलावर्गासाठी "खेळ पैठणीचा"मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी १० दिवस महोत्सवात मिळणार आहे. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्राम विकास मंडळ व ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शानिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोकणातील शेतकरीव्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कला - संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतूने गेली अनेक वर्षे सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे आयोजन करतात.



१० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याहस्ते या मालवणी महोत्सव - २०२५ चे उद्घाटन होणार आहे. १० दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपा नेते माजी मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आ.प्रविण दरेकर, आ.निरंजन डावखरे, आ.निलेश राणे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या