Investment: दररोज २०० रूपयांची बचत, तुमच्या मुलांना बनवणार करोडपती

  85

मुंबई: नव्या वर्षाची सुरूवात नव्या उमेदीने झाली आहे. २०२५मध्ये लोकांनी आपले आर्थिक आरोग्य तंदुरूस्त राखण्यासाठी अनेक गोल्स निर्धारिसत केले आहेत. यातच जर तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे असेल तर नव्या वर्षात त्यांना खास गिफ्ट द्या. यामुळे २४व्या वर्षी ते करोडपती बनू शकतील. म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. केवळ २०० रूपये प्रति दिवस अथवा ६ हजार रूपये प्रति महिना गुंतवणूक करून हे शक्य आहे.



म्युच्युअल फंड


म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे एसआयपी. ही एक लाँग टर्म इन्वेस्टमेंट प्रोसेस आहे. यात कंपाऊंडिंग फायदेही मिळतात तसेच जमा केलेला फंड वाढतो. आजच्या काळात केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकही यात इंटरेस्ट दाखवत आहेत.



दर महिना जमा करा ६ हजार रूपये


नव्या वर्षात कशी आणि किती रूपयांची सुरूवात करता येईल ज्यामुळे करोडपती बनता येईल. याचे कॅलक्युलेशन अगदी सोपे आहे. जर तुम्ही दररोज २०० रूपये अथवा महिन्याला ६ हजार रूपये वाचवून एसआयपी करत असाल तर तुम्ही हे लक्ष्य गाठू शकता. एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना सामान्यपणे १५ ते १६ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. मात्र आपण साधारणपणे १२ टक्के व्याज पकडून चालू. तर ६००० रूपयांची एसआयपी २४ वर्षांसाठी केल्यास तुमचे १७,२८,००० रूपये जमा होतात. यावर कंपाऊंडिंगसोबतचे रिटर्न्स ८३,०८,१२३ रूपये होतील. या हिशेबाने एकूण मिळून जेव्हा तुमचे मूल २४ वर्षांचे होईल तेव्हा त्याच्याकडे १,००,३६,१२३ रूपयांचा फंड असेल. म्युच्युअल फंडमध्ये १२ टक्केच नव्हे तर कधी कधी १५ ते १६ टक्क्यांपर्यंत गुंतवणूकदारांना रिटर्न्स मिळतात.


सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची लोकप्रिय पद्धत आहे. याच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपीचा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या बँक अकाऊंटमधून निर्धारित रक्कम कापली जाऊन ती एसआयपीमध्ये गुंतवली जाते. गेल्या दोन ते तीन दशकात म्युच्युअल फंडने जबरदस्त रिटर्न दिले आहेत. मात्र यासाठी योग्य त्या फंडची निवड करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.