Monkey : माकडाला पकडण्यासाठी वन विभाग पिंजरे लावणार

सोलापूर : बार्शी तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यात वाघ, बिबट्याची दहशत सुरू असतानाच उक्कडगाव येथे गत काही महिन्यापासून माकडाच्या सुरू असलेल्या उच्छादाबाबत वन विभागाला जाग आली. या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने उक्कडगाव येथे ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात येणार असून, माकडाला पकडून वन अधिवासात सोडले जाणार आहे. माकडाच्या बंदोबस्ताबाबत वन विभागाला निवेदन देऊनही वन विभागाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप होत होता. माकडाच्या वर्तवणुकीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.



सदर उपद्रवी माकड दिवसा थेट घरांत घुसून अन्नधान्याची, दूध, दुधाचे कँड, गहू, ज्वारी आदीचे नुकसान करत आहे. या माकडाने गावातील महादेव मंदिरात व मंदिरावर धुमाकूळ घालत चक्क मंदिराचा कळस हलवून नुकसान केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वीच या मोकाट माकडाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र, तरीही या पत्रावर कोणतीच कारवाई न झााल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात होता. माकडाने पाच ते सहा कुत्र्यांना पकडून फिरवत आपटून ठार मारल्यामुळे गावकरीही भयभीत झाले आहेत.


Comments
Add Comment

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला