Monkey : माकडाला पकडण्यासाठी वन विभाग पिंजरे लावणार

सोलापूर : बार्शी तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यात वाघ, बिबट्याची दहशत सुरू असतानाच उक्कडगाव येथे गत काही महिन्यापासून माकडाच्या सुरू असलेल्या उच्छादाबाबत वन विभागाला जाग आली. या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने उक्कडगाव येथे ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात येणार असून, माकडाला पकडून वन अधिवासात सोडले जाणार आहे. माकडाच्या बंदोबस्ताबाबत वन विभागाला निवेदन देऊनही वन विभागाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप होत होता. माकडाच्या वर्तवणुकीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.



सदर उपद्रवी माकड दिवसा थेट घरांत घुसून अन्नधान्याची, दूध, दुधाचे कँड, गहू, ज्वारी आदीचे नुकसान करत आहे. या माकडाने गावातील महादेव मंदिरात व मंदिरावर धुमाकूळ घालत चक्क मंदिराचा कळस हलवून नुकसान केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वीच या मोकाट माकडाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र, तरीही या पत्रावर कोणतीच कारवाई न झााल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात होता. माकडाने पाच ते सहा कुत्र्यांना पकडून फिरवत आपटून ठार मारल्यामुळे गावकरीही भयभीत झाले आहेत.


Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू