सोलापूर : बार्शी तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यात वाघ, बिबट्याची दहशत सुरू असतानाच उक्कडगाव येथे गत काही महिन्यापासून माकडाच्या सुरू असलेल्या उच्छादाबाबत वन विभागाला जाग आली. या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने उक्कडगाव येथे ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात येणार असून, माकडाला पकडून वन अधिवासात सोडले जाणार आहे. माकडाच्या बंदोबस्ताबाबत वन विभागाला निवेदन देऊनही वन विभागाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप होत होता. माकडाच्या वर्तवणुकीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
सदर उपद्रवी माकड दिवसा थेट घरांत घुसून अन्नधान्याची, दूध, दुधाचे कँड, गहू, ज्वारी आदीचे नुकसान करत आहे. या माकडाने गावातील महादेव मंदिरात व मंदिरावर धुमाकूळ घालत चक्क मंदिराचा कळस हलवून नुकसान केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वीच या मोकाट माकडाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र, तरीही या पत्रावर कोणतीच कारवाई न झााल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात होता. माकडाने पाच ते सहा कुत्र्यांना पकडून फिरवत आपटून ठार मारल्यामुळे गावकरीही भयभीत झाले आहेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…