Nashik : विजेच्या डीपीला चिकटल्याने ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नाशिक: नाशिकमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे जाऊद्दीन डेपो परिसरात खेळत असताना उघड्या डीपीला हात लागल्याने विजेच्या तीव्र धक्क्यामुळे पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आफ्फान नईम खान असं या दुर्देवी बालकाचं नाव आहे.


सोमवारी दुपारी चार वाजता घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत असून शहरातील उघड्या डीपी जीवघेण्या ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. आफ्फान नईम खान वय (०५) रा. आनंद कॉम्प्लेक्स मागे, गुलजारवाडी, सुभाष रोड, नाशिकरोड याची आई जाऊद्दीन डेपो येथील वजन काट्याच्या मागे असलेल्या गोडाऊनमध्ये बारदान गोणी शिवण्याचे काम करते.


नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या असताना आफ्फानही बरोबर होता. आई कामात गुंतलेली असतानाच आफ्फान हा खेळायला गेला. खेळता खेळता त्याचा हात उघड्या डीपीला लागला.


डीपीतील वायरींमुळे त्याला वीजेचा तीव्र धक्का बसला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी त्याला बाजूला करून जवळच्या बिटको रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर आफ्फानच्या आईची स्थिती न बघण्यासारखी झाली आहे. आफ्फानचे वडील नईम खान हे पेंटींग काम करतात.


शहरातील काही भागात उघड्या डीपी असून त्या धोकादायक स्थितीत आहे.अशाच एका डीपीमुळे पाच वर्षीय बालकास हकनाक प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे वीज मंडळाने उघड्या डीपींबाबत तातडीने उपाय योजना करावी आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या