IND vs AUS: टीम इंडियाचे स्वप्न भंगले, सिडनी कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव

  75

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५मधील शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ६ विकेट राखत मात केली. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी निकाल लागला. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते.


ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ४ विकेट गमावत पूर्ण केले आणि सामना जिंकला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-१ अशी जिंकली. यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे भारताचे स्वप्न भंग झाले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने फायनलमध्ये एंट्री मारली आहे. आता त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.


तिसऱ्या दिवशी केवळ अर्ध्या तासातच भारतीय संघ ऑलआऊट झाला होता. त्यांना केवळ १५७ धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने फलंदाजी सुरू केली. लंचच्या आधी ऑस्ट्रेलियाचे झटपट तीन विकेट पडले. मात्र त्यानंतर केवळ एकच विकेट बाद करण्यात भारतीय संघाला यश मिळाले. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे तिसऱ्या दिवशी खेळू शकला नाही.


याआधी पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने १८५ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १८१ धावा केल्या. पहिल्या डावातील चार धावांच्या आघाडीवर भारताने दुसऱ्या डावास सुरूवात केली मात्र दुसऱ्या डावातही भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांना दुसऱ्या डावात केवळ दीडशे धावांचाच टप्पा गाठता आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी १६० इतके माफक आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलियाने हे माफक आव्हान सहज पूर्ण केले.



मालिका विजय


सिडनी कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा विजय मिळवला आहे. पर्थमधील पहिली कसोटी भारताने जिंकली होती. हा सामना भारताने २९५ धावांनी जिंकला होता. भारताच्या धमाकेदार सुरूवातीनंतर वाटले होते की भारत ही मालिका जिंकेल. मात्र दुसऱ्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० विकेटनी पराभव केला. त्यानंतर ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी अनिर्णीत ठरली. मेलबर्नमधील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता सिडनीमध्येही कसोटी जिंकली.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र