Pune News : शहरातील प्रमुख १५ रस्ते कोंडीमुक्त करण्यावर भर; गतिमान वाहतुकीचा संकल्प!

पुणे : वाहतूक पोलीस आणि महापालिकेने संयुक्तपणे केलेल्या उपाययोजनांमुळे सोलापूर रस्त्यावरील कोंडी कमी झाली असून, वाहतुकीचा वेग वाढला आहे. सोलापूर रस्त्याप्रमाणे शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील वाहतूक लवकरच गतिमान होणार आहे. (Pune News)



‘सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, तसेच वेग याबाबत पोलीस आणि महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. स्वारगेटपासून हडपसरपर्यंत वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी रामटेकडी पूल, रविदर्शन, तसेच फातिमानगर चौकात वाहतूकविषय सुधारणा करण्यात आल्या. या कामांमुळे वाहतुकीचा वेग वाढला असून, कोंडीही दूर झाली आहे,’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ विभाग) अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेटा आर्क कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद रोडे, वाहतूक नियोजक निखिल निहार, तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी या वेळी उपस्थित होते.


सोलापूर रस्त्याच्या धर्तीवर येत्या काही दिवसांत शहरातील प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना केल्या जाणार आहेत. नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा, पाषाण, बाणेर, संगमवाडी, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता या रस्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवरील वाहतूकविषयक कामे केल्यानंतर कोंडीची समस्या कमी होऊन वाहतूक अधिक गतिमान होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुधारणा नेमक्या काय?




  • चौकांतील कोंडी दूर करणे

  • पदपथावरील अतिक्रमण हटविणे

  • दुभाजकांत सुधारणा

  • वाहने लावण्यासाठी जागा

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा