Cold Wave: राज्यात तापमानाचा पारा घसरला, सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचे चटके!

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा घसरू लागला आहे. उत्तरेकडचे थंड वारे महाराष्ट्रात येऊ लागल्याने थंडीचा जोर आणखी एकदा वाढू लागला आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक ठिकाणी तापमानाच्या पाऱ्यामध्ये १० अंशापेक्षा अधिक घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


पश्चिम चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलकासा पाऊस तसेच हिमालयालगतच्या भागांमध्ये बर्फवृष्टी होते. त्यामुळे तेथे थंडीचा जोर कमी जास्त होत आहे. शनिवारी मध्य प्रदेशातील मंडला येथे सर्वात कमी ५ अंश सेल्सियसची नोंद झाली. दरम्यान, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्यामुळे सकाळी थंडी तर दुपारी मात्र उन्हाचे चटके बसत आहेत.


राज्यातील धुळे, अहिल्यानगगर, निफाड, जळगाव, पुणे, नागपूर, गोंदिया येथे किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले होते. तर अनेक ठिकाणी धुक्यासह दव पडले होते.


शनिवारी दिवसभरात कमाल तापमानामध्ये वाढ झाली होती. मुंबईच्या सांता्क्रूझ भागात कमाल तापमानात 35 अंशांची नोंद झाली. तर पुण्यातही काही भागांमध्ये 33 अंशांपर्यंत कमाल तापमान गेलं होतं.
Comments
Add Comment

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल