Cold Wave: राज्यात तापमानाचा पारा घसरला, सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचे चटके!

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा घसरू लागला आहे. उत्तरेकडचे थंड वारे महाराष्ट्रात येऊ लागल्याने थंडीचा जोर आणखी एकदा वाढू लागला आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक ठिकाणी तापमानाच्या पाऱ्यामध्ये १० अंशापेक्षा अधिक घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


पश्चिम चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलकासा पाऊस तसेच हिमालयालगतच्या भागांमध्ये बर्फवृष्टी होते. त्यामुळे तेथे थंडीचा जोर कमी जास्त होत आहे. शनिवारी मध्य प्रदेशातील मंडला येथे सर्वात कमी ५ अंश सेल्सियसची नोंद झाली. दरम्यान, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्यामुळे सकाळी थंडी तर दुपारी मात्र उन्हाचे चटके बसत आहेत.


राज्यातील धुळे, अहिल्यानगगर, निफाड, जळगाव, पुणे, नागपूर, गोंदिया येथे किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले होते. तर अनेक ठिकाणी धुक्यासह दव पडले होते.


शनिवारी दिवसभरात कमाल तापमानामध्ये वाढ झाली होती. मुंबईच्या सांता्क्रूझ भागात कमाल तापमानात 35 अंशांची नोंद झाली. तर पुण्यातही काही भागांमध्ये 33 अंशांपर्यंत कमाल तापमान गेलं होतं.
Comments
Add Comment

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Railway : ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली

मुंबई : रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी अनेकदा रविवारी मेगाब्लॉक घेते. पण आज (रविवार १२ एप्रिल २०२६) सकाळीच

Stray Dogs Sterilized : मुंबईत वर्षाला करणार सुमारे ४५ हजार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

- पुढील तीन वर्षांसाठी संस्थांची नेमणूक मुंबई (सचिन धानजी) मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया