गुजरातमधील बंटी बबलीला नाशिकमध्ये अटक

नाशिक : सोने खरेदी करण्याच्या उद्देशाने सराफांच्या दुकानात प्रवेश करून हात चलाकीने सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन ज्येष्ठ बंटी बबलीला उपनगर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे साडेसहा तोडे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की, 17 डिसेंबर 2024 रोजी नाशिकरोड येथील पु.ना गाडगीळ अँड सन्स या सराफी दुकानात जस्ट बंटी बबलीने साडेतीन तोळे वजनाच्या दोन बांगड्या हात चलाखीने करून नेल्याबाबत फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. त्यावेळी गाडगीळ अँड सन्स यांच्या नाशिक शाखेतून उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना फोन द्वारे कळवले की, नाशिकरोड शाखेमध्ये ज्या ज्येष्ठ बंटी बबली ने दागिने चोरले होते, त्या वर्णनाचे दोन्ही नाशिक शाखेत आले आहे. पो नि सपकाळ यांनी तात्काळ पथक पाठवून स्वामीनारायण पार्क, नवान रोड, अहमदाबाद, गुजरात येथील चंद्रकांत विनोदभाई परमार (वय ५५) व त्याची बहीण पूनम कमलेश शर्मा (वय ५७) या ज्येष्ठ बंटी बबलीना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी केली.

त्यांनी नाशिकरोड येथील पु.ना गाडगीळ यांच्या दुकानात झालेल्या चोरीची कबुली दिली, त्यांना विश्वासात घेऊन आणखीन माहिती विचारली असता त्यांनी यापूर्वी सोलापूर येथील बाजार पोलीस ठाणे व पुणे शहरातील सहकार नगर पोलीस ठाणे येथे याच पद्धतीच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पाच लाख, तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या ज्येष्ठ बंटी बबली वर गुजरात मध्ये कर्ज झाल्यामुळे त्यांनी हा फंडा वापरण्याचे सांगितले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव कुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे, संदेश रंगतवान यांनी कामगिरी पार पाडली. या जेष्ठ बंटी बबली कडून पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचा वातावरण निर्माण झाले आहे व पोलिसांप्रती विश्वास निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू