Agriculturel Office : खोडाळा मंडळ कृषी कार्यालय घेत आहे शेवटचा श्वास

  59

मोखाडा : तालुक्यातील अतिशय महत्वाचे आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असलेले खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय मोडकळीस आलेले आहे. येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन कार्यालयीन कामकाज करावे लागत आहे. प्रस्तूत कार्यालयाची इमारत कधीही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील रहिवाशांच्या जीवितालाही धोका होणार असल्याने सदर इमारतीची तत्काळ डागडुजी करण्याची मागणी रहिवास्यांकडून केली जात आहे. मोखाडा तालुका कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या खोडाळा मंडळ कार्यालयातून परिसरातील ३० हून अधिक गांवांतील शेतीविषयक कामकाज तसेच ईतरही अनेक विकास कामे केली जातात त्यामूळे येथे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. त्याचबरोबर शेतीविषयक मार्गदर्शन शिबीरं, मिटिंग, दैनंदिन कामे इ कामे करतांना भेगा पडलेल्या भिंतीकडे पाहून कर्मचाऱ्यांना नैमित्तीक कामांचा निपटारा करावा लागत आहे.



मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची अवस्था अतिशय भयानक झालेली असून भिंतीसह छप्परावरही मोठे झाड उगवलेले आहे. या झाडाच्या मुळ्या थेट भिंत पोखरून कार्यालयात डेरेदाखल झालेल्या आहेत. त्यामूळे ईमारतीचा धोका आणखीनच वाढलेला आहे. बांधकाम विभागासह जिल्ह्याच्या वरिष्ठ कार्यालयांनी या धोकादायक ईमारतीची व परिसरातील रहिवाशांच्या जीवीताची दखल घेवून ईमारतीची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केलेली आहे. १९७२ साली प्रशिक्षण व भेट योजना आमलात होती त्यावेळी सदर ईमारत ही प्रशिक्षण व भेट योजनेकडे हस्तांतरित करण्यात आली होती.


दरम्यानच्या ५० वर्षात या ईमारतीची कोणत्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही. ईमारतीच्या पश्चिमेकडील भिंतीवर मोठे झाड उगवले असून त्याची मुळे भिंतीत घुसली आहेत त्यामुळे सदर भिंत ही केंव्हाही जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजूलाच वस्ती असून खेटून असलेल्या घरांवर भिंतीचे अवशेष पडल्यास मोठ्या प्रमाणावर वित्त हानी होऊन संभाव्य जीवित हानी टाळता येणार नाही त्यामुळे सदर इमारत तातडीने निष्काशीत करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

आरक्षण बदलाचा ‘गेम’ सर्वाधिक चर्चेत

पवार, रेड्डींचा मोठा प्रताप फसला गणेश पाटील विरार : बांधकाम परवानगी देताना लाच स्वीकारण्यासाठी 'रेट' ठरवून मलिदा

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८