Agriculturel Office : खोडाळा मंडळ कृषी कार्यालय घेत आहे शेवटचा श्वास

मोखाडा : तालुक्यातील अतिशय महत्वाचे आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असलेले खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय मोडकळीस आलेले आहे. येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन कार्यालयीन कामकाज करावे लागत आहे. प्रस्तूत कार्यालयाची इमारत कधीही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील रहिवाशांच्या जीवितालाही धोका होणार असल्याने सदर इमारतीची तत्काळ डागडुजी करण्याची मागणी रहिवास्यांकडून केली जात आहे. मोखाडा तालुका कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या खोडाळा मंडळ कार्यालयातून परिसरातील ३० हून अधिक गांवांतील शेतीविषयक कामकाज तसेच ईतरही अनेक विकास कामे केली जातात त्यामूळे येथे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. त्याचबरोबर शेतीविषयक मार्गदर्शन शिबीरं, मिटिंग, दैनंदिन कामे इ कामे करतांना भेगा पडलेल्या भिंतीकडे पाहून कर्मचाऱ्यांना नैमित्तीक कामांचा निपटारा करावा लागत आहे.



मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची अवस्था अतिशय भयानक झालेली असून भिंतीसह छप्परावरही मोठे झाड उगवलेले आहे. या झाडाच्या मुळ्या थेट भिंत पोखरून कार्यालयात डेरेदाखल झालेल्या आहेत. त्यामूळे ईमारतीचा धोका आणखीनच वाढलेला आहे. बांधकाम विभागासह जिल्ह्याच्या वरिष्ठ कार्यालयांनी या धोकादायक ईमारतीची व परिसरातील रहिवाशांच्या जीवीताची दखल घेवून ईमारतीची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केलेली आहे. १९७२ साली प्रशिक्षण व भेट योजना आमलात होती त्यावेळी सदर ईमारत ही प्रशिक्षण व भेट योजनेकडे हस्तांतरित करण्यात आली होती.


दरम्यानच्या ५० वर्षात या ईमारतीची कोणत्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही. ईमारतीच्या पश्चिमेकडील भिंतीवर मोठे झाड उगवले असून त्याची मुळे भिंतीत घुसली आहेत त्यामुळे सदर भिंत ही केंव्हाही जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजूलाच वस्ती असून खेटून असलेल्या घरांवर भिंतीचे अवशेष पडल्यास मोठ्या प्रमाणावर वित्त हानी होऊन संभाव्य जीवित हानी टाळता येणार नाही त्यामुळे सदर इमारत तातडीने निष्काशीत करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना