Video : बुमराहशी वाद घातला आणि लगेच बाद झाला

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सिडनी कसोटी सामन्यात अखेरच्या षटकात एक नाट्यपूर्ण प्रसंग घडला. जसप्रीत बुमराह शेवटच्या षटकासाठी सज्ज होत होता. तो चेंडू टाकण्यासाठी जाणार तोच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टास याने क्षुल्लक मुद्यावरून बुमराहशी वाद उकरून काढला. या वादात थोड्याच वेळात उस्मान ख्वाजा सहभागी झाला. ख्वाजा आणि बुमराह यांच्यातील वाद वाढणार तोच पंचांनी हस्तक्षेप केला. पंचांनी हस्तक्षेप करताच त्यांचा मान राखत बुमराह तातडीने गोलंदाजीसाठी रवाना झाला. यानंतर जसप्रीत बुमराहने टाकलेल्या चेंडूवर उस्मान ख्वाजा झेलबाद झाला. तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलकडे झेल देऊन परतला. ख्वाजा दहा चेंडू खेळून आणि दोन धावा करून तंबूत परतला. उस्मान ख्वाजा बाद होताच भारतीय खेळाडूंनी आनंदोत्सव सुरू केला. बुमराहशी वाद उकरुन काढणाऱ्या कॉन्स्टासचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.



गरज नसताना सॅम कॉन्स्टासने बुमराहशी वाद उकरून काढला. काही वेळा हे अनावश्यक वाद लाभदायी ठरतात तर काही वेळा हानीकारक ठरतात. यावेळी कॉन्स्टासने घातलेल्या वादामुळे भारताचा फायदा झाला आणि ऑस्ट्रेलियाचे नुकसान झाले.



वादामुळे खेळावर लक्ष केंद्रीत करणे अनेक खेळाडूंना कठीण होते. यामुळेच एखादा जम बसलेला खेळाडू बाद व्हावा अथवा वेळ वाया घालवणे शक्य व्हावे यासाठी अनेकदा प्रतिस्पर्धी वाद उकरून काढतात. या प्रकारात वाद सुरू करणारा स्वतःच्या फायद्याचा विचार करून प्रतिस्पर्ध्याची हानी करण्याचा प्रयत्न करतो. सिडनी कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपत आला होता. अखेरचे षटक टाकण्यासाठी कर्णधार बुमराहने चेंडू हाती घेचला होता. बुमराह सारख्या तगड्या गोलंदाजाने कोणाला बाद करू नये यासाठी वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाने केला. पण त्यांचा प्रयत्न अपयशी झाला. बुमराहने गोलंदाजी केल आणि ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज बाद झाला.
Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला