येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांना मिळणार न्याय

  68

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीताराम राणेंना दिले आश्वासन


ठाणे  : गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनात पारित केलेल्या सर्व ठरावांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, त्या-त्या विभागांच्या बैठका घेऊन निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांच्या विविध मागण्यांबाबत विचार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले असल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सीताराम राणे यांनी विधान परिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या सह भेट घेतली. यावेळी ठाण्यात प्रथमच अशा प्रकारे गृहनिर्माण संस्थांचे भव्य महाअधिवेशन आयोजित केल्याबद्दल अभिनंदन करून फडणवीस यांनी सीताराम राणे यांच्या १ जानेवारी रोजीच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिष्टचिंतन केले.



सहकार विभाग आणि ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात नुकतेच गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून हजारोच्या जनसमुदायाशी ऑडियो संवाद साधला होता. यावेळी त्यांनी गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास तसेच स्वयंपुनर्विकास यांसह इतर छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले होते. या अनुषंगाने, सीताराम राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी महाअधिवेशनात पारित झालेल्या ठरावांच्या गोषवाऱ्यासह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मागण्यांचा विस्तृत अहवाल सीताराम राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिनियम १५४ ब मध्ये सुधारणा करण्यासह स्वयंपुर्ण पुनर्विकासाबाबत २०१९ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करून लवकरच जिल्हा महासंघांना अधिसूचित करण्यात येईल, असे स्पष्ट केले. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाळीव प्राण्यांविषयीच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी या विषयाशी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून याविषयीची नियमावली करण्याबाबत विचार केला जाईल. त्याचबरोबर, गृहनिर्माण संस्थांच्या इतर विविध प्रश्न व ठरावां संदर्भात सहकार व गृहनिर्माण खात्यासह त्या-त्या विभागाची बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वस्त केले.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या