Health Secure Water : हे 'पाणी' प्यायल्यास लागत नाही वारंवार भूक; पचनप्रक्रिया राहील व्यवस्थित!

मुंबई : अनेकदा जेवल्यानंतर जेवण जिरवण्यासाठी किंवा पचवण्यासाठी अनेक पेयांचा उपयोग करतात. त्या पेयांनी उत्साहित आणि ताजेतवाने वाटत असले तरी ते आरोग्यास हानिकारकच आहे. सब्जाच्या बिया आपल्या शरीरासाठी योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्य निरोगी राहण्यासही मदत मिळते. सब्जामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅगनिज, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे पचनप्रक्रिया सुरळीत राहते.



सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात कधीही तुम्ही सब्जाचे पाणी पिऊ शकता. शक्यतो सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सब्जाचं पाणी पिण्याची योग्य वेळ आहे.अशाने दिवस छान आणि निरोगी जातो. अन्नाचे पचन सहजरित्या होण्यासाठी मदत मिळते. फिट राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचं कार्य योग्य पद्धतीने होणं आवश्यक असते. सब्जायुक्त पाणी प्यायल्यास आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज् जात नाही.लहान मुलं सब्जाचं पाणी पिण्यास नाकारत असतील तर सरबत सारख्या पेयांमधून सुद्धा देऊ शकता


हा सब्जा फक्त शरीरासाठीच नाही तर चेहऱ्यासाठी देखील उपयुक्त आहे. कोरियन फेशिअलच्या रेसिपी मध्ये अशा प्रकारच्या मास्कची नोंद आहे. तिथल्या तरुणी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी अशाप्रकारचा मास्क वापरतात.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे