पुणे : राज्य सरकारने (State Government) हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी (Soyabeen Purchase) नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच ही नोंदणीला फक्त मुदतवाढ दिली आहे. मात्र खरेदीची मुदत अद्यापही वाढविण्यात आली नाही. राज्यात १४ लाख १३ हजार टन खेरदीचे उद्दिष्ट असताना केवळ ३ लाख ६४ हजार टनांचीच खरेदी झाली आहे.
सरकारने यंदा राज्यात १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खेरदीचे उद्दिष्ट ठेवले होते. १५ ऑक्टोबर ते १२ जानेवारी दरम्यान खरेदीची मुदत देण्यात आली. तर हमीभावाने विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र नोंदणीतील अडचणींमुळे शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होऊ शकली नाही.
सोयाबीन खरेदीमधील अडचणी सुरुवातीपासूनच आहेत. हमीभावाने खरेदीसाठी सरकारने यंदा ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे नोंदणीत अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांना वेळेत एसएमएस मिळत नाहीत. कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी आहेत. या सगळ्या कारणांमुळे नोंदणी प्रक्रीया संथ गतीने सुरू आहे.
त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत केवळ ३ लाख ६४ हजार टन सोयाबीनची खरेदी पूर्ण करण्यात आली. म्हणजेच एकूण उद्दिष्टाच्या केवळ २६ टक्के खरेदी पूर्ण झाली. आतापर्यंत १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…