पुण्यप्राप्ती

सद्गुरू वामनराव पै


मनुष्य जीवनात पुण्य हेच प्रत्येक वेळेस उपयोगी पडते. पुण्य कमी पडले की, अडचणी येतातच. जीवनात याचे अनुभव आपल्याला येतच असतात. पण तरीही आपण त्याची चिकित्सा करत नाही. कर्म आपण केलेच पाहिजे, त्याचे फळ मिळणारच आहे. पण हे फळ तुमच्या मनासारखे मिळेलच असे नाही. कारण त्याला अनेक पैलू असतात, त्यात अनेक घटक असतात. अभ्यास केलेला आहे, पण ऐन वेळी परीक्षेत विसरतो, इथे पुण्य कमी पडते.


दोन मुले मुलाखतीसाठी गेलेली असतात, दोघांचे शिक्षण, अनुभव एकसारखेच. जर दोघांच्या सर्व अपेक्षित असलेल्या गोष्टी एकसारख्या, तर निवड मात्र एकाचीच का होते? ज्याच्या गाठीपाठी पुण्य आहे, त्याचीच निवड होते. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, पुण्य कमवा. गाठी व पाठी पुण्याई पाहिजे. वाडवडिलांची पुण्याई संपली की, त्यांच्यावर संकटे येऊ लागतात. वाडवडिलांची पुण्याई पाहिजे आणि आपणही पुण्याई कमवली पाहिजे. पुण्याई कमविण्याचा सोपा मार्ग संतांनी सांगितला तो म्हणजे नामस्मरण. आम्ही सांगतो प्रार्थना म्हणा. प्रार्थनेचे महत्त्व काय? प्रार्थनेने तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलते. नामस्मरणाचा प्रताप व विश्वप्रार्थनेचा प्रताप ह्यात फरक आहे तो माझ्या पुस्तकांतून सांगितलेला आहे.



सांगायचा मुद्दा हा की, पुण्य मिळवायचे मार्ग म्हणजे शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे. अगणित पुण्य ! अगणित पुण्य मिळविण्याचा हा सोपा मार्ग असताना कडू बोलावेच का? अनिष्ट विचार का करावे? अट्टाहासाने जे काही करायचे असेल ते चांगलेच करा, कारण त्यानंतर, तर अगणित पुण्य ! शुभ चिंतन केलेत, तर तुम्ही सुखी व्हाल, समाज सुखी होईल, राष्ट्र सुखी होईल. उपासना कशाला म्हणतात? शुभ चिंतन हीच उपासना, हीच आराधना, हीच भक्ती आणि तेच कर्मचांग. एवढे तुम्ही केलात की, तुम्हाला हवे ते मिळेल. आता हे करायचे की नाही हे तुम्ही ठरवा. कारण, “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.

Comments
Add Comment

दिवाळी प्रकाशपर्व... सांस्कृतिक व अध्यात्मिक

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे दिवाळी... सर्व सणांमधला सगळ्यात महत्त्वाचा सण. याला सणांचा राजा म्हटलं तरी काही वावगं

नैवेद्याची अर्पणयात्रा

ऋतुजा केळकर देवासमोर ठेवलेला नैवेद्य म्हणजे केवळ पाककृती नव्हे, तर एक भावनांची अर्पणयात्रा असते आणि त्या

महर्षी जमदग्नी

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी ‘जमदग्नीचा अवतार..’ असे म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर एखादी रागीट व्यक्ती उभी

कर्माचे उत्तराधिकारी

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ‘कर्मण्येवाधिकारस्ये मा फलेषु कदाचन’ हे सर्वांना माहीत आहे. कर्माचे

नरकासुराचा वध, राजा बळीची पूजा, तेलाने स्नान... दक्षिण भारतात दिवाळीचा अनोखा उत्सव

दिवाळीचा सण जवळ येत आहे आणि संपूर्ण उत्तर भारत त्याच्या उत्साहात जोरदार तयारी करत आहे. नवरात्रीनंतरच्या करावा

महर्षी व्यास

(भाग तिसरा) भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी