RBI : आजपासून 'या' प्रकारचे बँक खाते होणार बंद; आरबीआयचा निर्णय!

मुंबई : आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेक गोष्टींच्या नियमावलीत बदल झाले आहेत. अनेक गोष्टींचे भाव उतरले असले तरीही काही वस्तूंच्या दरात वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आता बँक खाते धारकांसाठीही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही गोष्टींच्या नियमावलीत बदल केला आहे. त्याचबरोबर आता देशातील सर्व बँकेतील काही खातेदारांचे खाते थेट बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध बँकेतील वापरात नसलेले सर्व ग्राहकांचे बँक खाते आरबीआय रद्द करणार आहे. बँकीग व्यवस्था सुधारण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.



कोणत्या प्रकारचे खाते रद्द् होणार?


निष्क्रीय खाते, कोणतेही व्यवहार न होणारे आणि शून्य बँक बॅलेन्स असणारी सर्व खाती आरबीआय रद्द करणार आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारी प्रकरण पाहता बँकींग व्यवहार न होणारी खाते सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जाऊ शकतात. त्यामुळे आरबीआयने वरील प्रकारची खाते बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.