Ratnagiri : राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत गार्गी घडशीने मिळवली लाखाची शिष्यवृत्ती

  73

रत्नागिरी : पुण्यात बालेवाडी येथे सक्सेस अबॅकस अ़ॅन्ड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत गार्गी घनश्याम घडशी हिने एक लाखाची शिष्यवृत्ती मिळवली आहे. अडीच हजार विद्यार्थ्यांमधून तिने स्वतःला सिद्ध केले आहे.





हुशारी, चातुर्य, तर्कशुद्धता, अंदाज, पाठांतर, उत्तम स्मरण, खेळात, अभ्यासात आवड अशा गुणांचा योग्य वेळी विकास झाला तर अशी मुले प्राथमिक शिक्षणापासूनच पालक, शिक्षक, मार्गदर्शन व स्वतःची जिद्द ठेवून पुढे वाटचाल करतात. त्यामध्ये गार्गी घनश्याम घडशी हिचा समावेश आहे. ती सावर्डे (ता. चिपळूण) येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहावीत शिकत आहे. गार्गी अशा स्पर्धेत नेहमीच भाग घेऊन अभ्यासाचे सातत्य राखत असते.



तिला मिळालेल्या पुरस्काराच्या वितरण सोहळ्यासाठी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर , अभिनेते स्वप्नील जोशी, सक्सेस अबॅकसचे मुख्य सीईओ किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गार्गी पेन्शन फायटर सौ. गौरी व घनश्याम घडशी यांची कन्या असून मुलीही कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.

Comments
Add Comment

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी