Kangana Ranut : कंगना रणौत म्हणते, आमच्या अ‍ॅक्ट्रेसपेक्षा हिमाचलच्या महिला सुंदर!

  114

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडीतील खासदार कंगना रणौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. कंगना रनौत हिने नुकतीच हिमाचल प्रदेशातील महिलांची तुलना बॉलीवूड अभिनेत्रींसोबत केली आहे. कंगनाने हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या किंवा वाढलेल्या प्रीती झिंटा आणि यामी गौतमसारख्या अभिनेत्रींचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की आमच्यापेक्षा चांगल्या दिसणाऱ्या स्त्रिया आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गुरं, शेळ्या-मेंढ्या आणि पशुपालन करत आहेत.



कंगनाने स्वतःच्या तसेच प्रीती झिंटा, यामी गौतम आणि लापता लेडीज फेम अभिनेत्री प्रतिभा रंता यांच्या छायाचित्रांचा कोलाज शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, हिमाचल प्रदेशचे लोक. जेव्हा मी हिमाचलला जाते आणि शेतात अथक काम करणाऱ्या आमच्या बरोबरीच्या किंवा त्याहून अधिक सुंदर स्त्रिया पाहते, तेव्हा तेथे कोणताही इन्स्टा किंवा रील नाही, त्या शेळ्या-मेंढ्या पाळतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. या महिला नक्कीच प्रसिद्ध होऊ शकतात, असे मला वाटते.


हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्याचे एका सर्वेक्षण अहवालात समोर आल्याने कंगना रणौतची ही पोस्ट समोर आली आहे.





कंगना रणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट इमर्जन्सी १७ जानेवारी २०२५ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर बोर्डाने चित्रपट मंजूर करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी काही वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्याची आणि बदलण्याची मागणी केली होती, परंतु कंगना ते न काढता रिलीज करण्यावर अडून होती. कंगना सेन्सॉर बोर्डाविरोधात कोर्टात पोहोचली होती. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता कंगनाला काही बदलांसह प्रमाणपत्र मिळाले आहे.


या चित्रपटात कंगना रनौतसोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.