Kangana Ranut : कंगना रणौत म्हणते, आमच्या अ‍ॅक्ट्रेसपेक्षा हिमाचलच्या महिला सुंदर!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडीतील खासदार कंगना रणौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. कंगना रनौत हिने नुकतीच हिमाचल प्रदेशातील महिलांची तुलना बॉलीवूड अभिनेत्रींसोबत केली आहे. कंगनाने हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या किंवा वाढलेल्या प्रीती झिंटा आणि यामी गौतमसारख्या अभिनेत्रींचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की आमच्यापेक्षा चांगल्या दिसणाऱ्या स्त्रिया आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गुरं, शेळ्या-मेंढ्या आणि पशुपालन करत आहेत.



कंगनाने स्वतःच्या तसेच प्रीती झिंटा, यामी गौतम आणि लापता लेडीज फेम अभिनेत्री प्रतिभा रंता यांच्या छायाचित्रांचा कोलाज शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, हिमाचल प्रदेशचे लोक. जेव्हा मी हिमाचलला जाते आणि शेतात अथक काम करणाऱ्या आमच्या बरोबरीच्या किंवा त्याहून अधिक सुंदर स्त्रिया पाहते, तेव्हा तेथे कोणताही इन्स्टा किंवा रील नाही, त्या शेळ्या-मेंढ्या पाळतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. या महिला नक्कीच प्रसिद्ध होऊ शकतात, असे मला वाटते.


हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्याचे एका सर्वेक्षण अहवालात समोर आल्याने कंगना रणौतची ही पोस्ट समोर आली आहे.





कंगना रणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट इमर्जन्सी १७ जानेवारी २०२५ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर बोर्डाने चित्रपट मंजूर करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी काही वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्याची आणि बदलण्याची मागणी केली होती, परंतु कंगना ते न काढता रिलीज करण्यावर अडून होती. कंगना सेन्सॉर बोर्डाविरोधात कोर्टात पोहोचली होती. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता कंगनाला काही बदलांसह प्रमाणपत्र मिळाले आहे.


या चित्रपटात कंगना रनौतसोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

Comments
Add Comment

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली