Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट

नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील डोंगराळ भागापासून ते दिल्लीच्या मैदानी भागापर्यंत सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्लीत शुक्रवारी पाऊस पडल्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे.



हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवार ३० डिसेंबर रोजी दिल्लीत सकाळी धुकं पडेल. किमान तापमान सहा अंश से. तर कमाल तापमान १८ अंश से. असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीत रविवारी किमान तापमान १३ अंश से. आणि कमाल तापमान १८ अंश से. होते. दिल्लीत धुक्यामुळे दृश्यमानता कमी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चालकांनी धुक्यातून वाहने चालवणे टाळावे आणि आवश्यकताच असेल तर हेडलाईट सुरू ठेवून आणि वेग नियंत्रणात ठेवून वाहन चालवावे असे आवाहन दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागाने केले आहे. धुक्याचा परिणाम रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे.



हिमवृष्टी आणि पावसामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. पर्यटक वाढल्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला आहे.



सध्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या सर्वच राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक मंदावली आहे. वाहतुकीचा वेग मंदावल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

वातावरण बदलल्यामुळे पर्यटनस्थळी गर्दी वाढली आहे. आणखी काही दिवस थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने