Lonavala : सावधान! लोणावळ्यात थर्टी फस्ट साजरी करायला जाताय? 'या' ठिकाणी असणार बंदी

  56

मावळ : नववर्ष सुरु (New Year 2025) होण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पर्यटन स्थळांना भेट देत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने मुंबईकर नजीक असणारे पर्यटन स्थळ लोणावळा (Lonavala) येथे भेट देतात. त्यामुळे लोणावळ्यात थर्टी फस्ट साजरी (31st Celebration) करायला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



प्रशासनाने थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणांवर बंदी घातली आहे. लोणावळ्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी वेगवेगळे स्पॉट आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र थर्टी फार्स्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा येथील टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. हा नियम ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी लागू असणार आहे, असे आदेश वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिले आहेत.


दरम्यान, लोणावळा येथील टायगर पॉईंट व लायन्स पॉईंट हे सन सेट पाहण्यासाठी चांगले ठिकाण आहे. यामुळे दरवर्षी याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा याठिाकणी बंदी असल्यामुळे २०२४ वर्षाचा शेवटचा सनसेट पर्यटकांना पाहता येणार नाही.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या