IND vs AUS : मेलबर्नमध्ये धावांचा पाठलाग सोपा नाही...टीम इंडियाला उभा करावा लागेल धावांचा डोंगर

मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड खेळवला जात आहे. या सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ९४ बाद २२८ इतकी होती. स्कॉट बॉलँड १० आणि नाथन लायन ४१ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा संघाकडे एकूण ३३३ धावांची आघाडी आहे.



भारतीय संघ रचणार इतिहास?


आता पाचव्या दिवसाचा खेळ रोमहर्षक असणार आहे. या दिवशी तीन निकाल लागू शकतात. भारताचा विजय, ऑस्ट्रेलियाचा विजय अथवा सामना अनिर्णीत. हे आता स्पष्ट झाले आहे की भारताला कमीत कमी विजयासाठी ३३४ धावांचे आव्हान मिळेल. मात्र हे आव्हान सोपे नाही. भारताला विजय मिळवायचा असेल तर वेगाने बॅटिंग करावी लागेल. भारतीय संघाला दुसऱ्या डावात चांगली सुरूवात मिळाली तर ते विजयाच्या जवळ पोहोचू शकतात. सुरूवातीला दोन-तीन विकेट पडल्यास भारतीय फलंदाज अनिर्णीतच्या दिशेने जाऊ शकतात.


मेलबर्नच्या मैदानावर चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणे सोपे नाही. या मैदानावर केवळ एकदाच ३००हून अधिक धावांचे आव्हान पार करता आले आहे. १९२८मध्ये इंग्लंडने असे केले होते. तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३२२ धावांचे आव्हान तीन विकेट गमावत मिळवले होते. पाहिल्यास या मैदानावर टॉप ५मध्ये तीन यशस्वी धावांचा पाठलाग इंग्लंडच्या नावावरच आहे.


भारतीय संघाला केवळ एकदाच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करता आला आहे. असे २०२०मध्ये झाले होते. यावेळेस अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ७० धावांचे आव्हान २ विकेट गमावत पूर्ण केले होते. २०११मध्ये जेव्हा भारतीय संघाला २९२ धावांचे आव्हान मिळाले होते तेव्हा ते आव्हान त्यांना पूर्ण करता आले नव्हते. त्यावेळेस भारतीय संघाचा १२२ धावांनी पराभव झाला होता.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या