वर्षअखेर आणि नववर्ष या काळात विदेशी पर्यटकांची त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी

नाशिक : भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा नेहमीच पाश्चात्त्य देशांवरती राहिला आहे. त्यामुळे यावेळी नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक मधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटकांची संख्या ही वाढू लागली आहे. मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक या ठिकाणी नववर्ष व वर्षा अखेर साजरा करण्यासाठीदाखल होऊ लागलेले आहेत.


वर्षा अखेर व नववर्षाकाळात त्रंबकेश्वरमध्ये विदेशी पर्यटक फॉरेनर देखील भेट देत असतात. भारतीय हिंदू संस्कृती या पर्यटकांना आकर्षण असते. असे विदेशी पर्यटक भारतातच मोठ मोठ्या शहरात राहतात परंतु देवदर्शनासाठी त्रंबकेश्वर मध्ये येतात. असे पर्यटक नाममात्र संख्येने येतात. परंतु त्रंबकेश्वर मध्ये मोठ्या सुविधा नसल्याने येथे न थांबता देवदर्शन आटपून निघून जातात.काही पर्यटक मंदिरात जात नाही. त्यांना पर्याप्त सुविधा उचित मार्गदर्शन त्रंबकेश्वर नगरीत मिळत नाही. विदेशी पर्यटक देखील त्रंबकेश्वरी मोठ्या संख्येने आले पाहिजे या दृष्टीने येथे नियोजन होणे गरजेचे आहे.


दरम्यान, नाताळ सुट्टी मुळे यात्रेकरूंची गर्दी आहे कुशावर्त तीर्थ गंगा गोदावरी मंदिरात देखील आता भाविकांची गर्दी असते. गंगा गोदावरी मंदिरात साडी चोळी देवून गोदावरीची ओटी देखील यात्रेकरू महिला भाविक भारतात. फोटोत महिला भाविकाने दिलेली साडी चोळी गोदावरी मूर्तीला पायाला लावून मूर्ती जवळ ठेवताना पुजारी दिसत आहे.गोदावरी मातेची ख्याती आता अधिकच वाढत आहे असे दिसते.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी