वर्षअखेर आणि नववर्ष या काळात विदेशी पर्यटकांची त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी

नाशिक : भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा नेहमीच पाश्चात्त्य देशांवरती राहिला आहे. त्यामुळे यावेळी नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक मधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटकांची संख्या ही वाढू लागली आहे. मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक या ठिकाणी नववर्ष व वर्षा अखेर साजरा करण्यासाठीदाखल होऊ लागलेले आहेत.


वर्षा अखेर व नववर्षाकाळात त्रंबकेश्वरमध्ये विदेशी पर्यटक फॉरेनर देखील भेट देत असतात. भारतीय हिंदू संस्कृती या पर्यटकांना आकर्षण असते. असे विदेशी पर्यटक भारतातच मोठ मोठ्या शहरात राहतात परंतु देवदर्शनासाठी त्रंबकेश्वर मध्ये येतात. असे पर्यटक नाममात्र संख्येने येतात. परंतु त्रंबकेश्वर मध्ये मोठ्या सुविधा नसल्याने येथे न थांबता देवदर्शन आटपून निघून जातात.काही पर्यटक मंदिरात जात नाही. त्यांना पर्याप्त सुविधा उचित मार्गदर्शन त्रंबकेश्वर नगरीत मिळत नाही. विदेशी पर्यटक देखील त्रंबकेश्वरी मोठ्या संख्येने आले पाहिजे या दृष्टीने येथे नियोजन होणे गरजेचे आहे.


दरम्यान, नाताळ सुट्टी मुळे यात्रेकरूंची गर्दी आहे कुशावर्त तीर्थ गंगा गोदावरी मंदिरात देखील आता भाविकांची गर्दी असते. गंगा गोदावरी मंदिरात साडी चोळी देवून गोदावरीची ओटी देखील यात्रेकरू महिला भाविक भारतात. फोटोत महिला भाविकाने दिलेली साडी चोळी गोदावरी मूर्तीला पायाला लावून मूर्ती जवळ ठेवताना पुजारी दिसत आहे.गोदावरी मातेची ख्याती आता अधिकच वाढत आहे असे दिसते.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे