मुंबई-गोवा महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर वावेदिवाळी गावच्या हद्दीत शनिवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी माणगाव पोलिसांत नोंद झाली असून, कारचालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम अनंता धारदेवकर (वय ६५) असे मृत व्‍यक्तीचे नाव आहे. कार महाडच्या दिशेने चालली होती, तर धारदेवकर हे कोलाडवरून माणगावच्या दिशेने चालले होते. या वेळी या कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यांच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


कारचालक मद्यधुंद असल्याचा आरोप मृत व्‍यक्तीच्या नातेवाइकांनी केला आहे. तसेच 'भारत सरकार' अशी पाटी असलेल्या या कारमध्ये अधिकारी होते.अपघात होताच ते सर्व जण पळून गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात