Sunil Tatkare : सागरी महामार्गाचे काम चार ते पाच वर्षात होणार पूर्ण; खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास

अलिबाग : कोकणच्या विकासात महत्वपूर्ण ठरणा-या सागरी महामार्गावरील आठ पूलांच्या कामाकरिता निधी मंजूर झालेला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्यात बरोबर महामार्गाच्या कामाल गती देण्यात येईल. परिणामी सागरी महामार्गाचे काम येत्या चार ते पाच वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.


दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर व माणगांव बायपासचे काम रखडले होते. तेथील भूमीसंपादनाची समस्या दुर झाली आहे. त्यामुळे या दोन्ही बायपासच्या कामांना आता वेग येईल. हे दोन्ही बायपास मार्ग सुरु झाल्यावर सध्या इंदापूर व माणगांव मधील वाहतूक कोंडीची समस्या पूर्णपणे संपेल व प्रवास वेगवान होईल. येथील सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन, हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपूरावा करणार असल्याचेही खा. तटकरे यांनी सांगितले.



याच मार्गाला जोडून पुढे कोकणच्या ग्रीनफिल्ड सागरी महामार्गाची रचना करण्यात आली आहे. यामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होऊ शकणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाच मोठी सागरी पुले बांधावी लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झालेले आहे. दुसरे पूल आहे, आगरदांडा-दिवेआगर तर तिसरे पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथेपूल आहे दाभोळ-जयगड या सर्व पूलांना ग्रीनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजूरी देण्यात आली आहे. मात्र हा महामार्ग होण्यास आणखी चार ते पाच वर्षे लागणार आहेत. किनारपट्टी सागरी महामार्गाची नवी रचना होत असताना दुस-या बाजुला आजच्या डिजिटल युगामध्ये नवतंत्रज्ञानाद्वारे सागरी किनारपट्टी विकास हाती घेण्यात आला आहे. देशातील १२ बंदरे आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकसीत होत आहेत, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत