Mumbai Pollution : मुंबईतील शहरांवर धुक्याचे साम्राज्य, थंडीच्या मोसमात वाढले प्रदूषण!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा सातत्याने खालावत असून प्रदूषणाच्या (Pollution) बाबतीत राजधानी नवी दिल्लीशी स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये धुक्याचे साम्राज्य होते. हवेचा दर्जा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला असून बोरिवली, कांदिवली, मालाड, माझगाव, नेव्हीनगर या ठिकाणी तर या वाईट हवेने टोक गाठल्याचे पहायला मिळाले. (Mumbai Pollution)



पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे विकास प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. धूलिकणांचे मोजमाप हे प्रति घनमीटर क्षेत्रात किती धूलिकण आहेत त्यानुसार केले जाते. धूलिकणाचे आकारमान पीएम २.५ आणि पीएम १० अशा प्रमाणात निश्चित होते. अतिसूक्ष्म धूलिकण म्हणजे पीएम २.५ हा हवेत विरघळणारा एक छोटासा पदार्थ असून, या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. पीएम २.५ ची मात्रा जास्त असते, तेव्हा धुक्याचे किंवा धूलिकणांचे प्रमाण वाढून दृश्यमानतेची पातळी घसरते.


अतिसूक्ष्म धूलिकणांपेक्षा किंचित मोठा म्हणता येईल, असा पण १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाच्या धूलिकणाला पीएम १० म्हटले जाते. हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) निर्देशांक ० ते ५०० मध्ये विविध स्तरावर मोजला जातो. त्यानुसार त्याचा चांगला, वाईट असे स्तर ठरतो. सकाळी मोठ्या प्रमाणात हवेत धूलिकण आणि प्रदूषण असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दिवस वायुप्रदूषणाची पातळी खाली येईपर्यंत मॉर्निंग वॉक थांबविण्याची गरज आहे. सकाळी वारा वाहण्याचे प्रमाण अधिक असल्याने धुळ आिण धुर अिधक प्रमाणात उडते. याचा परिणाम वातावरणावर होतअआहे. या वातावरणात प्रदूषित हवा श्वासावाटे शरीरात जात आहे. प्राणवायू शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. मेंदूला रक्तपुरवठा करण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे घरच्या घरी व्यायाम करा. शक्य असल्यास योग आणि प्राणायाम करा. (Mumbai Pollution)



अर्ध्या मुंबईची गुणवत्ता २०० पार


बोरिवली : २६९, मालाड : २४३,नेव्ही नगर : २२८,कांदिवली : २०७, माझगाव : २०५,देवनार : २००
हवेचा दर्जा मध्यम : वरळी : १८६, वांद्रे कुर्ला : १५१,: सायन : १४९, घाटकोपर : १३१, भायखळा : १३०, कुर्ला : १२४

Comments
Add Comment

Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या; म्हणाल्या, न घाबरता 'ती' भूमिका...महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वरून वाद पेटला!

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू