Nitish Kumar Reddy : नितीशची ऐतिहासिक कामगिरी

मेलबर्न : बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेतील चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. नितीश रेड्डीने केलेल्या शतकामुळे फॉलोऑनचे संकट टळले असले तरी अद्याप भारत ११६ धावांनी पिछाडीवर आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नऊ बाद ३५८ धावा केल्या. नितीश रेड्डी १०५ आणि मोहम्मद सिराज २ धावांवर खेळत आहे. शतकवीर नितीशने आतापर्यंत १७६ चेंडू खेळून एक षटकार आणि दहा चौकारांच्या जोरावर नाबाद १०५ धावा केल्या आहेत.



नितीश रेड्डी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज झाला आहे.त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेत आतापर्यंत आठ षटकार मारले आहेत. याआधी मायकल वॉनने २००२ - ०३ मध्ये ऑस्ट्रेलियातील ॲशेस मालिकेत आठ षटकार मारले होते. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने २००९ - १० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आठ षटकार मारले आहेत.आणखी एक षटकार मारताच नितीश रेड्डी हा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल फलंदाज होणार आहे.



ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव - सर्वबाद ४७४ धावा
भारताचा पहिला डाव - नऊ बाद ३५८ धावा
यशस्वी जयस्वाल ८२ धावा, रोहित शर्मा ३ धावा, केएल राहुल २४ धावा, विराट कोहली ३६ धावा, आकाश दीप शून्य धावा, रिषभ पंत २८ धावा, रविंद्र जाडेजा १७ धावा, नितीश कुमार रेड्डी नाबाद १०५ धावा, वॉशिंग्टन सुंदर ५० धावा, जसप्रीत बुमराह शून्य धावा, मोहम्मद सिराज नाबाद दोन धावा, अवांतर ११



ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारे तरुण भारतीय क्रिकेटपटू

  1. सचिन तेंडुलकर - सिडनी १९९२ - वय : १८ वर्षे २५६ दिवस

  2. रिषभ पंत - सिडनी २०१९ - वय : २१ वर्षे ९२ दिवस

  3. नितीश रेड्डी - मेलबर्न २०२४ - वय : २१ वर्षे २१६ दिवस

  4. दत्तू फडकर - अॅडलेड १९४८ - वय : २२ वर्षे ४६ दिवस


बॉर्डर - गावसकर ट्रॉफी (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

  1. पहिली कसोटी, पर्थ - भारताचा २९५ धावांनी विजय

  2. दुसरी कसोटी, अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय

  3. तिसरी कसोटी, ब्रिस्बेन - सामना अनिर्णित

  4. चौथी कसोटी, मेलबर्न - खेळ सुरू आहे

  5. पाचवी कसोटी, सिडनी - खेळ ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार

Comments
Add Comment

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर