मेलबर्न : बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेतील चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. नितीश रेड्डीने केलेल्या शतकामुळे फॉलोऑनचे संकट टळले असले तरी अद्याप भारत ११६ धावांनी पिछाडीवर आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नऊ बाद ३५८ धावा केल्या. नितीश रेड्डी १०५ आणि मोहम्मद सिराज २ धावांवर खेळत आहे. शतकवीर नितीशने आतापर्यंत १७६ चेंडू खेळून एक षटकार आणि दहा चौकारांच्या जोरावर नाबाद १०५ धावा केल्या आहेत.
नितीश रेड्डी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज झाला आहे.त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेत आतापर्यंत आठ षटकार मारले आहेत. याआधी मायकल वॉनने २००२ – ०३ मध्ये ऑस्ट्रेलियातील ॲशेस मालिकेत आठ षटकार मारले होते. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने २००९ – १० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आठ षटकार मारले आहेत.आणखी एक षटकार मारताच नितीश रेड्डी हा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल फलंदाज होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव – सर्वबाद ४७४ धावा
भारताचा पहिला डाव – नऊ बाद ३५८ धावा
यशस्वी जयस्वाल ८२ धावा, रोहित शर्मा ३ धावा, केएल राहुल २४ धावा, विराट कोहली ३६ धावा, आकाश दीप शून्य धावा, रिषभ पंत २८ धावा, रविंद्र जाडेजा १७ धावा, नितीश कुमार रेड्डी नाबाद १०५ धावा, वॉशिंग्टन सुंदर ५० धावा, जसप्रीत बुमराह शून्य धावा, मोहम्मद सिराज नाबाद दोन धावा, अवांतर ११
ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारे तरुण भारतीय क्रिकेटपटू
बॉर्डर – गावसकर ट्रॉफी (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…