गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध : मुख्यमंत्री

महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला ऑडीओ संवाद


ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकास तसेच स्वयंपुर्नविकास यासह इतर छोट्या मोठया अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्यासाठी मुंबईत बैठक घेऊ. असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आयोजित केलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामध्ये शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाशी ऑडिओ संवाद साधला. प्रारंभी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे उपस्थित राहू शकलो नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांच्या या पहिल्याच अधिवेशनाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन सुरू आहे. फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकाराने ठाण्यात प्रथमच होत असलेल्या महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गृहनिर्माण संबंधित विविध विविध विषयांवर तज्ञांची चर्चासत्रे पार पडली.


गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी भ्रमणध्वनीवर ऑडीओ संवाद साधला. गृहनिर्माण संस्थाचे ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच अधिवेशन होत असल्याचे सांगत फडणवीस यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा होती. परंतु देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे येथे पोहचु शकलो नाही, याबद्दल दिलगीरी व्यक्त करून ते पुढे म्हणाले, या महाअधिवेशनात जे काही निर्णय घेणार आहात ते निर्णय तसेच ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याकरीता मुंबईत बैठक बोलावून सोडवणार असल्याचे सांगितले. मागच्या काळात मुंबईत झालेल्या अधिवेशनाचा गृहनिर्माण संस्थांना फायदा झाला. त्या अधिवेशनातील १८ पैकी १६ मागण्या पुर्ण केल्या आहेत. त्याच धर्तीवर बैठक घेऊन पुर्नविकास अथवा स्वयंपुर्नविकास आणि इतर छोट्या छोट्या अडचणी निश्चितपणे सोडवु. असेही त्यांनी आश्वासित केले.


मुख्यमंत्र्याच्या संवादाचा धागा पकडून प्रविण दरेकर यांनी भाषणात, गृहनिर्माण संस्थांच्या चळवळीच्या पाठीशी स्वतः मुख्यमंत्री असुन मुंबईच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही स्वयंपूनर्विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारावर अवलंबून आहे मात्र, दिवसेंदिवस सहकार कमी होत आहे याकडे लक्ष वेधून सहकार क्षेत्राला ताकद देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महाअधिवेशनात उपस्थित इतर मान्यवरांनीही गृहनिर्माण संस्थाच्या विविध मागण्या व अडचणी विषयी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Abhishek bachchan : अखेर ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत अभिषेकनं सोडलं मौन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan ) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Mrunal Thakur : प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक ? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांना बसला धक्का

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)ची सध्या सर्वत्र चर्चा होत असून सोशल मीडियावर तिचा एक

Bigg Boss Marathi 6 : घरातून बाहेर पडला 'हा' सदस्य, प्रेक्षक म्हणाले...

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ (Big boss Marathi 6) यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले

Volkswagen Taigun Facelift : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ९ एप्रिलला होणार लॉन्च

मुंबई : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ही एसयूव्ही भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार असून कंपनीने तिची लॉन्च डेट ९

Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता