Devendra Fadnavis : आरोपींची संपत्ती जप्त करा आणि बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या सर्वांचे परवाने रद्द करा

  155

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सीआयडीला निर्देश


मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) मुख्य आरोपी १९ दिवसांपासून फरार आहेत. त्यामुळे बीड पोलिसांकडून तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत. तसेच बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया देखील तातडीने सुरू करा, अशा सूचना बीड पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत.


दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बीड जिल्ह्यामध्ये गन कल्चर सुरू असल्यावरून सरकारला लक्ष्य केले जात आहे. ट्विटच्या माध्यमातून अनेक फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले आहेत. यावरून बीडमध्ये मिशाही न फुटलेल्या पोरांसोरांच्या हाती बंदूक दिसून येत आहेत. खंडणीखोर फरार वाल्मिक कराडच्या मुलाचाही त्यांनी फोटो पोस्ट केला असून त्याच्याही कमरेला बंदूक दिसून येत आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.



अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार बीड, परभणी, अमरावती या ठिकाणी सर्वात जास्त परवाने दिल्याचे म्हटलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये तब्बल १ हजार २८१ जणांकडे शस्त्र परवाना आहे. दरम्यान, परवाना देताना सर्व प्रकारची शहानिशा करूनच परवाना दिला जातो. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा तपासली जाते. मात्र बीड जिल्ह्यामध्ये टपरी पोरं सुद्धा ज्या पद्धतीने बंदूक कमरेला लावून फिरत आहेत त्यावरून पोलिसांनी खेळण्यातील बंदूक दिल्याप्रमाणे परवाने दिले आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीडमध्ये तीन दिवसांपूर्वी कैलास फडला अटक केली आहे. त्याचाही हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले