Beed Muk Morcha : ‘पंकुताई संतोषच्या घरी का नाही गेला’? मूक मोर्च्यात सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल; तर धनुभाऊ बोगस मतांनी जिंकल्याचा धसांचा आरोप

बीड : बीड येथील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा (Beed Muk Morcha) आयोजित करण्यात आला होता. या मोर्च्यात खासदार संभाजीराजे छत्रपती, भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षिरसागर (Sandeep Kshirsagar), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या मोर्च्यात बोलताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी जोरदार फटकेबाजी करत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.


यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. ही पद्धत चुकीची आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार कोणालाही मुंगी मारण्याची परवानगी नाही. संतोष देशमुख तीन टर्मचा सरपंच होता. दोनदा जनतेतून निवडणून आला आणि एक वेळा बॉडीतून निवडून आला होता, असे सुरेश धस म्हणाले.



पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, मी ८० हजार मतांनी निवडून आलो. मात्र धनु भाऊ तुम्ही १ लाख ४२ हजार मतांनी निवडून आलात. ३३० बुथांपैकी २३० बुथ ताब्यात असतील तर हेच होणार. तुम्ही बोगस मतांनी जिंकून आले आहे, असा आरोप देखील यावेळी बोलताना सुरेश धस यांनी केला.


गोली मार भेजे में, भेजा जो करता हैं, असे गाणे सत्या पिक्चरमध्ये आहे. मात्र बीड जिल्ह्यात गोली मार किधर भी हो गया. जिल्ह्यात १२००-१३०० लायसन्स ज्या जिल्ह्याधिकारींनी दिले आणि ज्या पोलीस अधीक्षकांनी त्याला समर्थन दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही आमदार सुरेश धस म्हणाले. तसेच या प्रकरणातील मुख्य आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.


तर पंकजा मुंडे यांच्यावर टीका करत सुरेश धस म्हणाले की, पंकूताई माझा सवाल आहे की, तुम्ही संभाजीनगर एअरपोर्टला उतरला. १२ डिसेंबर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा दिवस आहे. मात्र तुम्ही वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का नाही गेला? असा सवाल आहे माझा, असे सुरेश धस म्हणाले. तसेच पंकजा मुंडे तुम्हाला चांगली माणसं कळत नाहीत. तुम्हाला फक्त जी हुजूर जी हुजूर करणारी माणसं पाहिजेत, असा टोला देखील त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना लावला.


Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह