बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा (Beed Morcha) काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे सहभागी होणार आहेत. या मोर्चात आजूबाजूच्या ५० गावांमधील नागरिक सहभागी होणार आहेत. बीडमधील सर्वपक्षीय मोर्चासाठी शहरात ४०० अंमलदार, वाहतुकीचे ७० अंमलदार, वरिष्ठ अधिकारी ४ पोलीस उपअधिक्षक, इन्चार्ज ऑफिसर, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक तैनात असतील. आरसीपीची ६ पथके, राज्य राखीव पोलीस दलाच्या २ एसआरपीएफ कंपनी आणि अधिक अतिरिक्त बंदोबस्त शहरामध्ये तैनात करण्यात आला आहे.
मस्साजोग (जि.बीड)चे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी बीड येथे आयोजित मोर्चात सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा समाजाचे लाखो लोक सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. संतोष देशमुख यांची कन्या आणि मुलगा या मोर्चात हजर होते. यावेळी वैभवी संतोष देशमुख हिने एक छोटेखानी भाषण केले. आमच्या परिवाराच्या मागे आपण उभे राहा, या प्रकरणातील दोषी लोकांना तत्काळ जेरबंद करून कडक कारवाई करावी, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या मुलीने केली. सरकारने ठोस पाऊल नाही उचलले तर १ जानेवारीला रेणापूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यासाठीचा सरकारवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे बीडमध्ये पोलीस प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याची चौकशी केली जात आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…