Alibaug News : अलिबागमध्ये पुढील दोन दिवस अवजड वाहनांना बंदी!

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी २५ डिसेंबर ख्रिसमसपासूनच अनेक लोकं सुट्टीवर गेले आहेत. या दिवसांमध्ये शाळांना देखील सुट्टी असते. अशावेळी अनेक कुटुंब बाहेर जाण्याचा प्लान करतात. फॅमिली पिकनिक म्हणून अलिबाग (Alibaug News) हे सर्वाच आवडीचं ठिकाण आहे. पण अलिबाग येथे प्रशासनाने पुढील दोन दिवस जड वाहनांना बंदी (Heavy van Banned) केली आहे.



अलिबागमधील मुरूड तालुक्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अलिबागमध्ये सुट्टीसाठी जाणाऱ्या पर्यटकांचा प्रवास आता सुखाचा होणार आहे.'



जड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची शक्यता


२८ आणि २९ डिसेंबर या दोन्ही दिवशी सुट्ट्या असल्यामुळे अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या वाढू शकते. त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अनेकदा जड वाहने रस्त्यांवर असल्यामुळे जास्त ट्रॅफिक जॅमची शक्यता असते. तसेच या वाहनांमुळे अपघात होण्याची देखील दाट शक्यता असते. या सगळ्याचा विचार करतो हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास