IND vs AUS : जयस्वालच्या अर्धशतकानंतरही मेलबर्न कसोटी ऑस्ट्रेलियाच्या हाती

मेलबर्न : बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेतील चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसअखेर कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे पूर्ण नियंत्रण असल्याचे चित्र आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात रडतखडत झाली. भारताने दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद १६४ धावा केल्या. अद्याप भारत ३१० धावांनी पिछाडीवर आहे. यशस्वी जयस्वालच्या अर्धशतकी खेळीनंतरही मेलबर्न कसोटीत भारतापुढील आव्हानं कमी झाल्याचे दिसत नाही.



सलामीवीर यशस्वी जयस्वालने ११८ चेंडूत एक षटकार आणि अकरा चौकारांच्या जोरावर ८२ धावा केल्या. तो धावचीत झाला. कर्णधार रोहित शर्मा फक्त तीन धावा करून झेलबाद झाला. केएल राहुल २४ धावा करून त्रिफळाचीत झाला. विराट कोहली ३६ धावा करून झेलबाद झाला. आकाश दीप तर शून्य धावांवरच झेलबाद होऊन परतला. रिषभ पंत सहा आणि रविंद्र जाडेजा चार धावांवर खेळत आहे. अवांतर नऊ मिळाल्यामुळे भारताने पाच बाद १६४ धावा एवढी मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड आणि कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

बघा : झोपण्यापूर्वी मध खाण्याचे फायदे


बॉर्डर - गावसकर ट्रॉफी (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

  1. पहिली कसोटी, पर्थ - भारताचा २९५ धावांनी विजय

  2. दुसरी कसोटी, अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय

  3. तिसरी कसोटी, ब्रिस्बेन - सामना अनिर्णित

  4. चौथी कसोटी, मेलबर्न - खेळ सुरू आहे

  5. पाचवी कसोटी, सिडनी - खेळ ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण