Pune : पुणे हादरलं! खेळताना बेपत्ता झालेल्या चिमुकल्यांचे दयनीय अवस्थेत आढळले मृतदेह

पुणे : कल्याण मधील घटना ताजी असतानाच पुण्यातील राजगुरू नगर मध्ये दोन चिमुकल्या मुलींची हत्या करण्यात आली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या दोन मुली अचानक गायब झाल्या होत्या. मात्र त्यांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरा एका इमारतीच्या बाजूला दयनीय अवस्थेत एका पिंपात आढळले आहे. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या मुली घराजवळून बेपत्ता झाल्या होत्या.



ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत. राजगुरूनगर येथे काल दुपारी दोन चिमुकल्या घराजवळ खेळतांना बेपत्ता झाल्या होत्या. पालकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. पण त्यांचा काही शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर त्या दोघींचे मृतदेह राजगुरूनगर शहरातील एका इमारतीच्या ड्रममध्ये दयनीय अवस्थेत सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत काय झाले? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार नवी दिल्ली:  स्थानिक स्वराज्य

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत