Onion Price: कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

  74

नाशिक: जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आता कांद्याचे भाव(Onion Price) सातत्याने कोसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झालेली आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना ६० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.


पूर्ण देशामध्ये कांद्याच्या असलेल्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नव्याने लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. लासलगाव जिल्ह्यातील प्रमुख १५ बाजार समितीमध्ये दररोज दोन ते अडीच लाख क्विंटलची कांद्याची आवक होत असल्याने गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ६० कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याने परदेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवा, तसेच गेल्या पंधरा दिवसांमध्ये विक्री झालेला कांदा व विक्री होणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटलला दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळच्या सत्रात ९०० वाहनातून १५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली या कांद्याला जास्तीत जास्त २,३०० रुपये, कमीतकमी ७०० रुपये तर सरासरी १,५०० रुपये इतका दर मिळाला. दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली असून हा असंतोष आता बाहेर पडायच्या मार्गावरती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांदा प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यात मोठे आंदोलन होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या