Onion Price: कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

नाशिक: जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आता कांद्याचे भाव(Onion Price) सातत्याने कोसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झालेली आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना ६० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.


पूर्ण देशामध्ये कांद्याच्या असलेल्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नव्याने लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. लासलगाव जिल्ह्यातील प्रमुख १५ बाजार समितीमध्ये दररोज दोन ते अडीच लाख क्विंटलची कांद्याची आवक होत असल्याने गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ६० कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याने परदेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवा, तसेच गेल्या पंधरा दिवसांमध्ये विक्री झालेला कांदा व विक्री होणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटलला दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळच्या सत्रात ९०० वाहनातून १५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली या कांद्याला जास्तीत जास्त २,३०० रुपये, कमीतकमी ७०० रुपये तर सरासरी १,५०० रुपये इतका दर मिळाला. दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली असून हा असंतोष आता बाहेर पडायच्या मार्गावरती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांदा प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यात मोठे आंदोलन होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये