Hyperloop Project : मुंबई-पुणे प्रवास होणार अवघ्या अर्ध्या तासात! सुरु होणार हायपरलूप वाहतूक व्यवस्था

मुंबई : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी ३ ते ४ तासांचा कालावधी लागतो. मात्र आता हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात पार पडणार आहे. मुंबई पुणे दोन्ही महानगरांदरम्यान हायपरलूक वाहतूक व्यवस्था सुरु होणार आहे. हा भारतातील पहिला 'हायपरपूल प्रकल्प' (Hyperloop Project)  असणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार असून वाहतुकीच्या अन्य माध्यमांच्या तुलनेमध्ये हा प्रकार अधिक सुरक्षित असणार आहे.


हायपरलूप प्रकल्प कॉक्रीट ट्यूब, मोटर कर्मशलायजेशन, मॅग्नेटीक लेविएशन मॉड्यूल अशा नव्या तांत्रिक कल्पनावर केले जात आहे. येत्या पाच वर्षात म्हणजेच २०२९ पासून ही वाहतूक व्यवस्था प्रवाशांच्या सोयीसाठी सज्ज होणार आहे. मुंबई-पुणे प्रवास हवाई मार्गाने करायचा असल्यास साधारणपणे ३,००० रुपये खर्च येतो. तर वंदे भारत एक्सप्रेसने हा प्रवास करताना ७५० रुपयांचे तिकीट काढावे लागते. मात्र या प्रवासासाठी १,००० ते १,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजेच या वाहतूक व्यवस्थेमुळे विमान, रेल्वेपेक्षा कमी खर्चात आणि तुलनेने कमी वेळेत मुंबई-पुणे प्रवास करता येणार आहे.



काय आहेत या मार्गाचे फायदे?



  • गाडीने किंवा रेल्वेने हा प्रवास ३-४ तासांचा आहे. तेच आता अर्धा तासात प्रवास पूर्ण होईल.

  • हायपरलूप वाहतूक व्यवस्था पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे.

  • मुंबई-पुणे या दोन महानगरांमधील औद्योगिक व्यवस्था, वाहतूक आणि पर्यटनाला चालना मिळेल.

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे महामार्गावर होणार वाहतुकीचा प्रश्न सुटेल.


प्रकल्पासमोरील आव्हाने कोणती?



  • इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेव्हिएशन आणि ट्यून सिस्टीममध्ये नव्या अपडेटची गरज आहे.

  • प्रकल्पासाठी कायदेशीर तरतूदी पूर्ण करत त्यासाठी परवानगी मिळवणे.

  • प्रकल्पाचे योग्य नियोजन करुन निधीचा योग्यपणे वापर करणे.

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हायपरलूप नेटवर्क तयार करणे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य