Cab driver : एनआरआयची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक

मुंबई : मुंबईत एका विदेशी भारतीय नागरिकाला (NRI) रिक्षा चालकाने जास्तीचे पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला. काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत अशीच घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेलेल्या एका नॉन रेसिडेन्शियल इंडियन (एनआरआय) व्यक्तीबरोबर असाच प्रकार घडला. टॅक्सी चालकाने (Cab driver) या व्यक्तीला विलेपार्लेपर्यंतच्या अवघ्या १० मिनिटांच्या प्रवासासाठी २,८०० रुपये द्यायला लावण्यात आले.


सहार पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ डिसेंबर रोजी घडली. डी विजय हे ऑस्ट्रेलियाहून मुंबई विमानतळावर मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. ऑस्ट्रेलियात रहाणारे आणि मूळ नागपूर येथील विजय यांनी पोलिसांना सांगितले की, विमानतळाबाहेर येताच कॅब चालक विनोद गोस्वामी त्याच्याजवळ आला. तसेच त्याने विजय यांना बनावट अॅप दाखवून फसवणूक केली. विजय यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गोस्वामी याला अटक केली.



विजय हे मुंबई विमानतळावरून गोस्वामींबरोबर गेले. पण विजय यांना टॅक्सीचे पैसे देताना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी उतरलेल्या हॉटेलमध्ये यासंबंधी चौकशी केली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की ते त्यांच्या पीक अप सेवेसाठी ७०० रुपये घेतात. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सहार पोलिसांना कॅब चालकाच्या मोबाईल क्रमांकासह ई-मेल पाठवून तक्रार केली. गोस्वामीने विजय यांना पुढच्या वेळी शहरात आलात तर कॉल करा, असे म्हणून स्वत:चा फोन नंबर दिला होता. या नंबरच्या मदतीने पोलिसांनी गोस्वामीचा १२ तासांच्या आत शोध लावला आणि त्याचे वाहन देखील जप्त केले.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर